Documents
Documents  esakal
जळगाव

Jalgaon News : दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षेनंतर ‘परीक्षा’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची बारावीची परीक्षा संपली तर दहावीचा एक पेपर शिल्लक आहे. नवीन शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे जूनपासूनच दहावी व बारावीनंतर पाल्यांच्या शिक्षणाची चिंता पालकांना असते, पाल्याला पुढील शिक्षण कोणते द्यायचे याचे नियोजन तयार असते. त्यासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालक जूनपासून धावपळ करतात. खरतर एप्रिलपासूनच विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता विद्यार्थी व पालकांनी करण्याची गरज आहे. (Jalgaon Post examination rush of students along with parents for various certificates)

दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत. अलीकडील काही वर्षांपासून विविध कोर्सच्या शिक्षणासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता अधिक भासू लागली आहे. मुळात दहावी बारावीची परीक्षा दिलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन आधीच झालेले असते, परंतु त्यासाठी आवश्यक दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती घेण्याकडे बहुतांश पालकांचे दुर्लक्ष होते.

परीक्षा संपल्यानंतर दोन ते अडीच महिन्याची सुट्टी असते. पाल्याच्या शिक्षणाची दिशा आधीच ठरली असेल तर या सुटीत आवश्यक दाखले काढून घेण्याची संधी पालकांना असते, परंतु जूनमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतरच दाखल्यासाठी रांगा लागतात. दाखला लवकर हवा असतो, मात्र गर्दीमुळे दाखले मिळण्यास उशीर होतो.

जूनमध्ये एकदमच गर्दी वाढल्याने दाखले वेळेत मिळणे मुश्किल होते. मुळात एखादा दाखला काढायचा म्हटला तरी त्यासाठीची भरमसाठ कागदपत्रे काढताना नाकीनऊ येते. त्यामध्ये जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. (latest marathi news)

यामुळे विशेष करून असे दाखले वेळेत ताब्यात घेण्यासाठी आतापासूनच नियोजन गरजेचे आहे. जूनमध्ये एकाच वेळी सर्वजण दाखल्यांसाठी धावपळ करत असल्याने यंत्रणेवरही ताण येतो, लवकर दाखले मिळत नसल्यास पुन्हा यंत्रणेलाच दोष दिला जातो, म्हणूनच सुट्टीमध्ये दाखले काढून घेण्यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज आहे.

निवडणूक कामाचे कारण नको

सुट्टीत दाखले काढण्यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरू असतात. काही पालक यंदाही सुटीत दाखले घेण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महसूल विभाग निवडणूक कामात व्यस्त आहे. परंतु सुट्टीत दाखले काढण्यात येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, याची यंत्रणेला काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीचे कारण पुढे न करता दाखले देण्यासाठी प्रशासनाला विशेष नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

...या दाखल्यांची अधिक गरज

दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी डोमेसाईल, तहसील उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी ईडब्ल्यूएस, कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी, कुणबी नोंद नसणाऱ्यांसाठी नव्याने एसईबीसी दाखला, अल्पभूधारक दाखला आदी दाखल्याची गरज असते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास कसरत असून, त्याची बेगमी आतापासूनच सुरू केल्यास पालकांची धावपळ थांबण्यास मदत होईल, असे सुविधा केंद्रचालकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT