Rail
Rail sakal
जळगाव

जळगाव : रेल्वेने सर्वसामान्य श्रेणीचे तिकीट केले बंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सर्वसामान्यांना रेल्वेचा प्रवास रेल्वे सुरू झाल्यापासून परवडणारा ठरला आहे. यामुळेच रेल्वेला अधिकाधिक गर्दी होतेय. मात्र रेल्वेचे जसे खासगीकरण सुरू झाले तसतसा रेल्वेला प्रवासी नकोसे झालेय. कारण प्रवासी गाडीपेक्षा मालवाहतुकीतून कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वे मिळते. सोबत वीज, पाणी आदी सुविधाही मालवाहतुकीत द्यावा लागत नाही. रेल्वे प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न कमी मिळते. यामुळेच कोरोनानंतर रेल्वेने वातानुकूलित, स्लिपर श्रेणीचेच तिकीट देणे सुरू केले. सर्वसामान्य श्रेणीच तिकीट देणे बंद केल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होताहेत.

रेल्वेतून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना अगोदर तिकीट मिळत नाही. मिळाले तर वेटिंगचे मिळते. जेव्हा प्रवासाचा दिवस येतो. तेव्हा वेटिंग असलेले तिकीट कन्फर्म होत नाही. यामुळे तिकीट रद्द करावे लागते अन्‌ प्रवासही तिकीट रद्द करताना चाळीस टक्के रक्कम कापली जाते. लाखो प्रवासी दररोज तिकीट कन्फर्म न झाल्याने प्रवास रद्द करतात. त्यातून रेल्वेला काहीही न करता कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. केवळ तिकीट विक्री अन्‌ रद्द यातूनच कोट्यवधींचे उत्पन्न यामुळे रेल्वेला सुगीचे दिवस आहे.

दिवाळीच्या सुट्या संपल्याने नागरिक आपापल्या नोकरीवर रुजू होण्यासाठी नोकरीच्या गावाला परतू लागले आहेत. कोरोना काळात रेल्वेसेवा बंद होती. नंतर ती सुरू झाली. आजच्या स्थितीत आरक्षणाशिवाय रेल्वेत प्रवास करता येत नाही. यामुळे सर्वसामान्यांना रेल्वेत ‘नो एंट्री’ आहे. ज्यांनी तिकीट दोन ते चार महिन्यापूर्वी काढलेले आहे अशांना तिकीट कन्फर्म मिळते. मात्र ज्यांनी प्रवासाच्या एक महिनाभर किंवा पंधरा दिवस अगोदर तिकीट काढलेले असेल त्यांना वेटिंगच मिळते.

दलालांकडून घेतले तर कन्फर्म

रेल्वेच्या तिकिटाच्या काळाबाजाराबाबत रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र कोणत्याही दलालावर रेल्वेने कारवाई केल्याचा प्रकार समोर आला नाही. जे तिकीट सर्वसामान्य प्रवासी काढतो ते वेटिंग मिळते. अन्‌ एजंटमार्फत काढले तर कन्फर्म कसे मिळते? याचे उत्तर दलाल व तिकीट देणाऱ्या रेल्वे क्लार्कलाच माहिती.

सर्वसामान्यांसाठी रेल्वेगाडी नाही, असे म्हणायची आता वेळ आली आहे. रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नसतो अन् सर्वसामान्य श्रेणीचे तिकीट रेल्वे बंद केले आहे. एकेकाळी सर्वसामान्यांची म्हटली जाणारी रेल्वे सर्वसामान्यांपासून दूर जात आहे.

- राजेश कुलकर्णी, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT