PM Kisan Yojana latest marathi news
PM Kisan Yojana latest marathi news esakal
जळगाव

PM Kisan लाभार्थ्यांना KYC पूर्ण करण्यासाठी 31 जुलैची मुदत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण केलेले नाही, अशा लाभार्थ्यांना ते पूर्ण करण्यासाठी आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (July 31 deadline for PM Kisan beneficiaries to complete KYC jalgaon Latest Marathi News)

पात्र लाभार्थी शेतकरी यांना ई-केवायसी करण्यासाठी पुढीलप्रमाणे ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या लाभार्थी शेतकरी यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल, अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील ई-केवायसी या टॅबमधून ओटीपीद्वारे लाभार्थींना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (सीएससी) बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रांवर बायोमॅट्रिक पद्धतीने केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रतिलाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण पंधरा रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलै अखेरपर्यंत आपले ईकेवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT