girl suicide 
जळगाव

रात्री गप्पा मारल्या अन्‌ पहाटे घेतला गळफास

रईस शेख

जळगाव : अयोध्यानगरातील रहिवासी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. 

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जान्हवी मिलिंद खडके (वय १९, रा. हनुमान मंदिराजवळ अयोध्यानगर) या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. 

एकुलती एक लाडली
रात्री जान्हवीने कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारल्यानंतर अचानक तिने हे का केले, याबाबत आश्‍यर्च व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. जान्हवीचे वडील किराणा दुकान चालवितात. एकुलत्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. वडील मिलिंद, आई हर्षासह जान्हवीचा लहान भाऊ जतीन असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल नरसिंग पाडवी, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत वृत्त कळताच नातेवाईकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT