raksha khadse 
जळगाव

मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यातच सरकार व्यस्त अन्‌ जनतेकडे दुर्लक्ष; खासदार रक्षा खडसेंचा आरोप 

कैलास शिंदे

जळगाव : राज्यातील सरकार मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यात व्यस्त आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी (ता. ५) येथे केला. 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याबाबत बोलताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी त्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. याउलट दर महिन्याला मंत्र्यांची नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ या मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यात व्यस्त असते. त्यामुळे आज जनतेच्या समस्या सोडविण्याकडे हे सरकार लक्ष देऊ शकत नाही. 

राजीनामा देण्यास उशीर
गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की मागच्या एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण बाहेर आले आहे; परंतु राजीनामा देण्यास उशीर झाला आहे. राज्यात जी काही गुन्हेगारी वाढते आहे. त्याला कुठे ना कुठे तरी लगाम बसला पाहिजे. भाजपच्या माध्यमातून आम्ही त्याबाबत अनेक वेळा निवेदन दिले आहे. 

जनतेची सेवा करण्याकडे लक्ष द्यावे
राज्याचे गृहमंत्री यांच्यावर जे आरोप झाले, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी जनतेच्या रक्षणाची कामे व्हायला हवी होती, त्याऐवजी वसुलीची कामे झाल्याने पोलिसांचे लक्ष पूर्ण याच गोष्टीकडे वळले. त्यामुळे जनतेची कामे होऊ शकली नाहीत. आता न्यायालयाने चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिल्याने यात बरचशे मुद्दे बाहेर येतील. पोलिसांनी यापुढे केवळ जनतेची सेवा करण्याकडे लक्ष द्यावे, वसुलीकडे लक्ष देऊ नये. कारण हा त्यांचा व्यवसाय नाही. त्यांनी केवळ जनतेला सेवा देण्याचे कार्य करावे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. 

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT