gram 
जळगाव

खानदेशात ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी

राजेश सोनवणे

जळगाव : खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग आला आहे. बाजारातील दरांच्या तुलनेत शासकीय दर अधिक आहेत. शिवाय शासकीय केंद्रात विक्रीसाठी नोंदणीही बऱ्यापैकी झाली होती. यामुळे खानदेशात गेल्या आठ दिवसात सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. 
जळगाव जिल्ह्यात १४, धुळ्यात चार, नंदुरबारात सहा हरभरा खरेदी केंद्र सुरू आहेत. यात जळगाव जिल्ह्यात १७ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तर नंदुरबारात सात हजार क्विंटल आणि धुळ्यातही सुमारे सहा हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदीला या आठवड्यात वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यात सुरवातीला फक्त १३ खरेदी केंद्र सुरू होते. बोदवड येथील केंद्र बंद होते. पण हे केंद्रदेखील गेल्या आठवड्याच्या अखेरिस सुरू झाले. या केंद्रातही हरभऱ्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली आहे. 

दहा शेतकऱ्यांची नोंदणी
जळगाव, चोपडा, रावेर येथील हरभरा खरेदी केंद्रात अधिकची खरेदी झाली आहे. धुळ्यात शिरपूर येथे खरेदीला प्रतिसाद अधिक मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. हरभरा खरेदीसाठी कोरोनामुळे मर्यादीत संख्येत शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. जेथे गोदाम निश्चित केले आहे, तेथेच हरभऱ्याची तोलाई केली जाते. यामुळे थेट गोदामात हरभरा मागवून घेतला जात आहे. काही गोदामे शेतकऱ्यांना लांब पडत असल्याने वाहतूक खर्च अधिकचा येत आहे, अशी माहिती मिळाली. बारदानाही  मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खरेदीत अडचणी नाहीत. हरभरा खरेदीची रोजची मर्यादा प्रत्येक केंद्रात कोरोनामुळे निश्चित केली आहे. यामुळे खरेदी लवकर पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT