sugar produced 
जळगाव

राज्यात १०२ लाख टन साखरेचे उत्पादन; ऊस गाळप अंतिम टप्प्यात  

बाळकृष्ण पाटील

गणपूर (जळगाव) : राज्यातील यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उत्तरार्धात आला असून राज्यातील ११० कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. ५ एप्रिलपर्यंत राज्यातील १८९ साखर कारखान्यांनी ९७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०२ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. 
हंगामाच्या सुरवातीला राज्यातील ९५ सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी ११० कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. राज्याचा साखर उतारा १०.४७ असला तरी कोल्हापूर विभागाचा सर्वाधिक म्हणजे ११.९९ टक्के तर पुणे विभागाचा १०.८९ इतका आहे. सोलापूर विभागाचा ९.३७ तर नगर विभागाचा ९.७६ इतका साखर उतारा आहे. औरंगाबाद विभागाचा ९.५८ तर नांदेड विभागाचा ९.९८ टक्के साखर उतारा असून अमरावतीचा ८.९३ साखर उतारा, नागपूर विभागाचा ९.३ टक्के आहे. 

खानदेशातील अशी आहे स्‍थिती
खानदेशात अजून ऊस तोड सुरू असून धुळ्यात शिरपूरमधील दत्तप्रभु ऍग्रोमध्ये लाखाच्या आसपास गाळप झाले असून नंदुरबारमधील सातपुडा तापीमध्ये ४ लाख ४६ हजार ३४५ मेट्रिक टन गाळप होऊन ४ लाख १४ हजार १३५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. तर नवापूरमधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात एक लाख १४ हजार ७४६ मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून ९६ हजार ११५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आयान मल्टी ट्रेडमध्ये ३ लाख ७९ हजार ३९० मेट्रिक टनाचे गाळप होऊन ३ लाख ८४ हजार ५४५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. जळगावमधील संत मुक्ताबाई शुगरने ३ लाख ४६ हजार १२० मे. टन ऊस गाळप करून ३ लाख ४३ हजार २२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खानदेशात बऱ्याच भागात ऊसतोड आटोपली असली तरी अजून काही भागात ऊस उभा असून ऊसतोड संथ गतीने सुरू आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT