जळगाव

कांदा दरवाढीचा जूळेना मेळ, शेतकऱयांच्या भावनेशी होतो खेळ ! 

किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : कांद्याच्या भावात चढ-उतार नेहमीच होतात; मात्र सध्या काहीच ठिकाणी एखाद-दोन कांदा गोण्या चांगला भाव मिळाला, की त्यांच्या पट्ट्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. कांद्याचा भाव वाढल्याचा आभास निर्माण केला जातो. परिणामी, चांगल्या भावाच्या आशेने शेतकरी जास्त माल विक्रीस आणतात आणि फसतात. मालाची आवक वाढताच भाव पाडले जातात. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.

आवश्य वाचा- सरकारमधील मंत्र्यांनी पीकविमा कंपन्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची केली फसवणूक : महाजन 

कांद्याचे भाव अचानक वाढणे वा कमी होणे, हा प्रकार तसा नित्याचाच; परंतु तो कशामुळे होतो, याचे कोडे अजून शेतकऱ्यांना सुटलेले नाही. बाजारात कांदा आल्यावर काही व्यापारी मोजक्याच दहा-वीस शेतकऱ्यांना चांगला भाव देतात. त्यातून कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र निर्माण होते. सोशल मीडियातून ते गावोगावी पसरते. यातून भाव वाढल्याचा आभास निर्माण होऊन शेतकरी चांगले भावाच्या अपेक्षेने आपलाही कांदा बाजारात आणतात आणि भावात घसरण सुरू होते. शेतकरी आक्रमक होतात. लिलाव बंद पाडण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. काही व्यापारी आपले हित साधण्यासाठी, तसेच साठेबाजीसाठी असे प्रकार करतात. मात्र, त्यात फरफट होते ती सामान्य शेतकऱ्यांची. त्यामुळे बाजार समित्यांनी लिलावाच्या भावाची माहिती देताना, जादा भाव निघालेल्या कांद्याच्या किती गोण्यांची विक्री झाली, याचीही माहिती देणे आवश्यक आहे. त्यातून कांद्याचा सरासरी भाव काढल्यास भाववाढीचा भडका थांबविण्यास मदत होऊन शेतकऱ्यांवरही आंदोलनाची वेळ येणार नाही. सध्या कांद्याला सरासरी साडेसात हजार रुपये क्विंटल भाव आहे. मात्र, काही ठिकाणी मोजक्या कांद्याचा १२ हजार रुपये क्विंटलने विक्री झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 


भाववाढीची शक्यता 
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांतही लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातून पीक गेले. त्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले असून, चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT