kisan railway 
जळगाव

देशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता  ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस  धावत आहे.  किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आतापर्यंत 25 फेरीच्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक ही भुसावळ विभागातून करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास राष्ट्रीय बाजारपेठ मिळत असून, शेतकरी सुखावला आहे.

किसान रेल्वेमध्ये डाळिंब, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते. या मालाची वाहतूक भुसावळ विभागातील देवळाली, नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असून, भुसावळ विभागातून 15 आक्टोबरला 209 टन वाहतूक आणि 17 ऑक्टोबर ला 200 टन मालाची वाहतूक ही करण्यात आली आहे.

कमी खर्चात वेगवान वाहतूक
किसान रेल्वे  7 ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे. याला  शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची  वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजा डिलिवरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी असल्याने मोठ्या प्रमाणात  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT