जळगाव : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची सुरवात होत आहे.
अभियानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात गावपातळीवर व नागरी भागात प्रभाग पातळीवर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात शासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा समावेश आहे. नियुक्त पथके आपल्या घरी भेट देऊन ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करतील.
कोरोना साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो. जिल्ह्यात सद्यःस्थितीत २५ हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत; परंतु लक्षणांकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो. रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी भेट देणाऱ्या पथकांना सहकार्य करून त्यांना कुटुंबातील सदस्यांची परिपूर्ण माहिती द्यावी व कुटुंबाचा कोरोना संसर्गापासून बचाव करावा.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.