जळगाव

कोरोना से डरोनो ! कुटूंबाची जबाबदारी ओळखा आणि आजारांची खरी माहिती द्या 

देविदास वाणी

जळगाव  ः कोरोनामुळे जिल्ह्यात झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले, तर अनेक व्यक्ती या उपचारासाठी उशिरा आल्याचे दिसून येते. यामुळे अशा व्यक्तींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनाही मर्यादा येतात. तेव्हा मला कोरोना झाला, हे इतरांना कळले तर समाज काय म्हणेल, याचा विचार न करता कोणताही आजार अंगावर न काढता त्याची तत्काळ तपासणी करून घ्यावी. कुठलाही संकोच न (कोरोनो से डरोना) बाळगता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक कुटुंबाने आपली खरी माहिती द्यावी व स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की जिल्ह्यात यापूर्वीही सर्वेक्षण करण्यात आले आहे; परंतु या मोहिमेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेत आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहेत. ज्या नागरिकांना जुने आजार, कोरोनासदृश लक्षणे आढळतील, त्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. लक्षणे आढळून आल्यास अशा संशयितांची तपासणी करून आवश्यकता भासल्यास त्यांचे ‘स्वॅब’ घेण्यात येणार आहेत. 

१४६२ पथकांद्वारे सर्वेक्षण 
मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील महापालिका, पालिका व ग्रामीण क्षेत्रात एक हजार ४६२ पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत दररोज ५० पेक्षा अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशीच जिल्ह्यात १३ हजार ६१५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा 
सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा २५ ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी; यात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबाबतही आरोग्य पथकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्याबाबत घ्यावयाची काळजी, त्यांना ताप, सर्दी, खोकला असल्यास काय दक्षता घ्यावी, याबाबतचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

...तर कोरोनापेक्षाही घातक! 
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या काळात आरोग्य पथके घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये काही लक्षणे असल्यास त्याची माहिती नागरिकांनी स्वतःहून पथकास द्यावी. कोरोनासदृश लक्षणे, जुने आजार असूनही त्याची माहिती यंत्रणेला न देणे, हे स्वतःच्या आरोग्यासाठी कोरोना विषाणूपेक्षा घातक आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT