जळगाव

खडसेंनी ‘नो कमेंट्स’ म्हणत सस्पेन्स कायम ठेवला !

देविदास वाणी

जळगाव : मुंबई वारी करून आलेले भाजपतील नाराज नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. मुंबईहून परतल्यानंतर रविवारी माध्यम प्रतिनिधींनी खडसेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ‘ब्र’ शब्दही न उच्चारता मुक्ताईनगरकडे प्रयाण केले. तेथेही पत्रकारांना ‘नो कमेंट्स’ म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून भाजपत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत खडसेंनी वेळोवेळी राज्य नेतृत्वावर तोफ डागली. गेल्या महिन्यात त्यांनी थेट फडणवीसांचे नाव घेत टीका केली. तेव्हापासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने जोर धरला. शरद पवारांनी यांच्या प्रवेशाची चाचपणी केल्यानंतर खडसे स्वत: तीन-चार दिवसांपासून मुंबईत होते. त्या ठिकाणी त्यांची पवारांशी भेट होणार, अशीही चर्चा रंगली. मात्र, ती भेट काही झाली नाही. 

जळगावी परतले 
मुंबईत नियमित वैद्यकीय तपासणी व पक्षाच्या बैठकीसाठी गेल्याचा दावा त्यांनी केला असला तरी त्यांच्या पक्षांतराची चर्चा ते परतल्यानंतरही सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. रविवारी याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी ‘ब्र’ शब्दही न उच्चारता वाहनात बसून मुक्ताईनगरकडे प्रयाण केले. मुक्ताईनगरलाही पत्रकारांशी त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडेे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT