वाकोद (ता. जामनेर) : शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करत असून, त्यांच्या अंमलबजावणीला स्थानिक पातळीवरून खीळ बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. कर्जमाफी धारक शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज देण्यात यावे, असे खुद कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले होते. तसेच ज्या कर्ज माफीधारक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झाले नाही. अशा शेतकऱ्यांना देखील कर्ज वाटप करावे, असे महाराष्ट्र शासनाचे आदेश असताना देखील जिल्हा बँकेने अशा शेतकऱ्यांना अजून नवीन कर्ज दिले नाही.
यासंदर्भात पालकमंत्री तसेच कृषी मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सूचना देऊन देखील जिल्हा बँक आपला आग्रह सोडत नसल्याचे समोर येत आहे. शेतकरी हिताकडे कुणीही लक्ष देत नसून, जिल्हा बँक स्वहित पाहत असल्याचे यावरून समजते. याकडे जिल्हा बँकेच्या इतर संचालक यांनी देखील लक्ष घालणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व बँकांना ज्या कर्जमाफीधारक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झाले नाही. अशा शेतकऱ्यांना अजून कर्ज वाटप केले नसून, तसे आम्हाला आदेश नाही असे स्थानिक सचिव सांगत आहे. ही बाब तात्काळ पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून माहिती घेतो. तशा संबंधितांना सूचना करतो असे ‘सकाऴ’़शी बोलताना सांगितले. आता त्यांचेकडून काय कार्यवाही होते याकडे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक प्रशासनाकडून टाळाटाळ
पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे ‘सकाळ’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता, त्यांनी शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्ज वाटप झाल्याचा पुरावा मागितला असता, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने वाकोद (ता. जामनेर) येथील विविध कार्यकारी सोसायटीकडे पन्नास टक्के संदर्भात जिल्हा बँकेचे पत्र तथा कर्ज वाटप संदर्भात अहवाल मागितला. तेव्हा त्यांनी बँकेकडून घ्या, तर बँकेत गेले असता सोसायटीतून घ्या अशा पद्धतीने टाळाटाळ करत माहिती दिली नाही. तरी देखील ज्या शेतकऱ्यांना ५० टक्के कर्ज मिळाली. अशा शेतकऱ्यांचे नावे शोधून पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिली असता, यावर तात्काळ कार्यवाही करतो असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.