gulabrao patil eknath khadse 
जळगाव

खडसेंनी ‘आर पार की लढाई’ लढावी ः गुलाबराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ग्रामीण भागातून एखादा नेता वर यायला नको म्हणून फडणवीस व मंडळीने खडसेंसारखा उत्तर महाराष्ट्रातला नेता संपविला, असा आरोप करत खडसेंनी आता माघार न घेता ‘आर पार की लढाई’ लढावी, असा सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. 
आज जळगावात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता ते म्हणाले, खडसे युद्धावर तर जातात, मात्र युद्ध पूर्ण लढत नाही. त्यांनी यापुढे आता ‘आर पार की लढाई’ केली पाहिजे. खडसेंसारख्या दिग्गज ओबीसी नेत्याला फडणवीस व मंडळीने संपविले. उत्तर महाराष्ट्रातले नेतृत्व पुढे यायला नको, ग्रामीण भागातील कुणी नेता व्हायला नको म्हणून यांचे कारस्थान सुरु आहे. आता या वादातून खडसेंनी शेवटपर्यंत लढावे आणि ‘एक घाव दोन तुकडे’ करावे, असा सल्लाही गुलाबराव पाटलांनी दिला. 

कंगणाचा वाद मुद्दाम काढलेला 
राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपने कंगणा रणौतचा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. आमचे सरकार विविध पातळीवर चांगले काम करत असून ते सहन होत नसल्याने व विरोधकांकडे काही मुद्दाच नसल्याने हा वाद केवळ पुढे करण्यात आला आहे, असेही पाटील म्हणाले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT