जळगाव

तापीचे ६२ टीएमसी पाणी गुजरातला 

देविदास वाणी

जळगाव  : अर्ध्या जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर (ता. भुसावळ) धरणातून यंदा आतापर्यंत सुमारे एक हजार ७५२ दशलक्ष घनमीटर (६२ टीएमसी) पाणी तापी नदीतून गुजरातला सोडण्यात आले आहे. हतनूर धरणाचे तब्बल ९४ वेळा दरवाजे उघडून बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के पाऊस झाल्याने मोठ्या धरणासह मध्यम प्रकल्पात चांगला साठा झाला आहे. 


जिल्ह्यात १० ऑगस्टपासून संततधार सुरू आहे. सोबतच विदर्भ व मध्य प्रदेशातही पाऊस सुरू आहे. विदर्भातील वाहत येणारी पूर्णा नदी तापीला मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चांगदेव संगमावर मिळते. त्यामुळे तापीच्या पाण्यात प्रचंड वाढ होते. सध्या तेच सुरू आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या तापी नदीतून येणारे पाणी हतनूर धरणात अडविले जाते. 

अधिक गाळामुळे विसर्ग 
धरणाची पाणी साठवणक्षमता ३८८ एमएम क्यूब एवढी आहे. त्यापेक्षा अधिक पाणी साठविले जाऊ शकत नाही. शिवाय हतनूर धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गाळाचे प्रमाण असल्याने धरण लगेच ‘ओव्हरफ्लो’ होण्याचा धोका असतो. परिणामतः धरण भरण्याच्या अगोदरच, पावसाचा अंदाज घेत विसर्ग करण्यात येतो. धरणाला एकूण ४२ दरवाजे आहेत. त्यांपैकी ३६ दरवाजे आतापर्यंत ९४ वेळा पाणी सोडण्यासाठी उघडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत या प्रकल्पातून ६२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. धरणाची क्षमता अधिक असती तर पाणी धरणातच साठविले असते. सोबतच धरणाला डावा कालवाही नाही. उजवा कालवा आहे. त्याद्वारे यावल, रावेर, सावदा, फैजपूर या तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. 

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणांतील साठा 
धरण------टक्केवारी 
हतनूर--२५.८० 
गिरणा--५५.४० 
वाघूर--९१.६१ 

धुळे : प्रकल्पातील साठा (टक्के) 
पांझरा …..७८.७० 
मालनगाव….९९.९८ 
जामखेडी…...१०० 
अनेर ……..४०.५३ 
अक्कलपाडा - ४२.७४ 
वाडीशेवाडी - ९२.३९ 
सुलवाडे ….२३.२४ 

नंदुरबार : मध्यम प्रकल्पातील साठा 
विरचक ---७६ टक्के 
दरा………७३ 
नागन……..६९ 
कोरडी…….७६ 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT