Girish Mahajan
Girish Mahajan 
जळगाव

आघाडी सरकारचे विर्सजन व्हावे हे जनतेच्या मनातील इच्छा-गिरीश महाजन

भूषण श्रीखंडे

जळगावः राज्यात जनता, शेतकरी, विद्यार्थी अनेक प्रश्नांनी त्रस्त असून आमच्या मनात नसून हे आता जनतेच्या मनातच आहे की महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) विर्सजन व्हावे, असे मत भाजपचे नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

जळगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजनांशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, की आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून सध्याच्या घडामोडीवर बघत आहोत. भारतीय जनता पार्टी देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातखाली विरोधीपक्षाची चोख पणे भुमीका बजावीत आहे. कोण काय म्हणते, कोण गंमतीच म्हणतात याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे खोचक टोला यावेळी त्यांनी आघाडीतल नेत्यांना लागविला.

जनता त्रस्त..

राज्यातील सर्व जनता त्रस्त असून प्रत्येक जणांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई, विज बिल, विद्यार्थ्यांचे परिक्षा, तसेच सर्व सामान्य जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त असून या आघाडी सरकारला जनतेची काही घेणे देणे नाही. त्यामुळे जनतेच्या मनातच आता ही आघाडी सरकारचे केव्हा विर्सजन होईल असे वाटत आहे असे म्हणून आघाडी सरकारविरुध्द टिका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT