जळगाव

नारायण राणे म्हणजे राजकारणातील बेरोजगार, केवळ ‘टीआरपी’साठी बोलतात 

कैलास शिंदे

जळगाव: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, ते बेरोजगार आहेत. ते राजकारणातील सशीक्षत बेरोजगार आहे. त्यामुळे आपले महत्त्व व चर्चेत राहण्यासाठी तसेच ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी केवळ ते बोलत असतात. अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

जळगाव येथे रानभाजी महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाणार प्रकल्पासंदर्भात नारायण राणे यांनी वक्तव्य करतांना पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा आहे, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, की राणे मुख्यमंत्री असतांना त्यांनी कोकणमध्ये कोणते विकास कामे केले, एक सुध्दा प्रकल्प ते आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना कशावरही बोलण्याचा अधिकार नाही अशी सडकून टिका मंत्री पाटील यांनी केली.  

महाराज हे प्रत्येकाच्या मनात 
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबाबत बोलतांना ते म्हणाले, की कर्नाटक सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू शकते. मात्र, जनतेच्या मनातून काढू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला त्या ठिकाणी जाऊन झुकविले आहे. तर कर्नाटक सरकार काय विशेष आहे. जगात सूर्य, चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा पुतळा हटवून कर्नाटक सरकारने आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT