जळगाव

जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?

सुधाकर पाटील


भडगाव : राज्य शासनाने ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) नुकसानीपोटी दोन हजार ८०० कोटींची मदत जाहीर केली. मात्र, त्यात जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला एक दमडीही मिळाली नाही. जिल्ह्यात खरीप हंगामाचे (Kharif Season) तब्बल पाच लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्य शासनाने (State Government) ६ ऑक्टोबरला मार्च ते जूनदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीपोटी राज्यासाठी १२२ कोटींची मदत जाहीर केली होती. त्यात जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये आले आहेत. मात्र ‘ती’ मदत रब्बीच्या नुकसानीची आहे.

आता खरिपाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘ती’ मदत दिली आहे, म्हणून खरिपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणजे झाले. लोकप्रतिनिधीनींही याबाबत शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाकडे मांडणे आवश्यक आहे. शासनाचा हा निर्णय बाहेर आल्यानंतर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.


...ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गौताळा व औट्रम डोंगरात झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यांत प्रचंड नुकसान झाले. भडगाव तालुक्यातील ९१, तर चाळीसगाव तालुक्यातील ७५७ हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली. ५० हेक्टरवरील जमिनीची मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेकडो जनावरांनी पाण्याच्या प्रवाहात जलसमाधी घेतली. अनेकांची घरे पडून संसार उघड्यावर आले. दुकाने पाण्यात बुडाल्याने रोजगाराचे साधन गेले. या नुकसानीची कृषीमंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार, खासदारांनी भेटी देऊन पाहणी केली. तत्काळ मदत देण्याबाबत आश्वासन दिले. मात्र, त्यांनाही या मदतीत एक रुपया मिळालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचीही क्रूर चेष्टा केल्याच्या प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT