MLA Anil Patil 
जळगाव

शेतकऱ्यांना मदत द्या,आमदार पाटीलांचे महसुल मंत्र्याना साकडे

Jalgaon Farmer News: पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

चालू वर्षाचा खरीप हंगाम कोलमडला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.


अमळनेर : जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ टक्के देखील पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे ६८ हजार ६८५ हेक्टर एवढ्या पेरणीयोग्य (Sowing) क्षेत्रापैकी ४३ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट (Sowing Crisis) ओढवले आहे. खानदेशात (Khandesh) असलेली दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात घेता आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी मंगळवारी (ता. ३) तातडीने मुंबई गाठून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Revenue Minister Balasaheb Thorat), कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांची भेट घेऊन मतदारसंघातील पावसाअभावी पीडित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.


अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७० मिलिमीटर आहे. चालू हंगामात जूनमध्ये ७६.६ मिलिमीटर व जुलै महिन्यामध्ये ९०.८ मिलिमीटर असे एकूण १६७.४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. अर्थात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे ६८ हजार ६८५ हेक्टर एवढ्या पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४३ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे.


दुष्काळ जाहीर करावा
चालू वर्षाचा खरीप हंगाम कोलमडला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे तत्काळ पंचनामे करून अमळनेर विधानसभा मतदारसंघ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करावे, शेतीपंपाचे चालू वर्षाचे वीजबिल माफ करावे, तसेच चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, या प्रमुख मागण्या मंजूर कराव्यात, अशी विनंती आमदारांनी कृषी, महसूल व मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केली.


खानदेशात असलेली दुष्काळाची भयानक दाहकता लक्षात आणून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही वेळ घेऊन भेट घेणार आहे. त्यांना देखील मतदारसंघातील दुष्काळाचा सविस्तर अहवाल देण्यात येईल.
- अनिल पाटील, आमदार, अमळनेर मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT