जळगाव

योजनांचा लाभ थेट बँकांमार्फत द्या  ​

दिपक चौधरी

मुक्ताईनगर : सामान्य जनतेच्या व्यक्तिगत उत्कर्षासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत. त्या बँकांच्या माध्यमातून थेट उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या बँकांच्या शाखा व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्राच्या भरीव आणि महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण स्तरावर अल्प प्रमाणातच उपलब्ध होत आहेत. बँकांच्या कर्मचाऱ्यांची तुल्यबळ संख्या वाढविण्यात यावी आणि प्रगत बँकांचे नियोजन ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. तसेच सुरळीत व अखंडित इंटरनेट सेवासुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केले. 

ग्रामीण भागात सरकारी बँकांच्या कमी शाखा असल्यामुळे भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ ग्रामीण स्तरातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामीण स्तरावर सरकारी बँकांची नवीन शाखा गावोगावी स्थापन करण्यात याव्या. तसेच एक गाव एक शाखा असे बँकांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याच बरोबर उपलब्ध असलेल्या बँक शाखांमधील मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात यावी. भारत सरकारच्या विविध योजनांना ग्रामीण स्तरावरील जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जनसमुदायाचे प्रमाण मोठे आहे. यात शेतकऱ्यांसंबंधित पंतप्रधान फळपीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना यासह विद्यार्थ्यांसाठी मुद्रा योजना, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पावलावर उभे राहण्यासाठी पंतप्रधान स्टँडअप योजना, बचत गटांतील महिलांसाठी काही महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारच्या आहेत. सध्या सरकारच्या विविध योजना बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागातील विस्कळीत इंटरनेट सेवेमुळे व तुटपुंज्या बँक कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे विशेष करून शेतकऱ्यांना, बचत गटातील महिलांना व विद्यार्थ्यांना सामान्य कामकाजाकरताही दोनदोन दिवस बँकेत भल्यामोठ्या रांगेत उभे राहावे लागते. 

अखंडित इंटरनेट सेवा द्या 
भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून शेतकरी, बचत गटांतील महिला व विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सुदृढ व अखंडित इंटरनेट सेवेसह प्रगत बँकांच्या शाखा उपलब्ध करून देण्यासह बँकेमधील मनुष्यबळ वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करावा. तसेच प्रगतशील योजनांची भक्कम पायमल्ली बँकांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. या उपाययोजनेतून विविध योजनांचा ग्रामीण भागातील वंचित शेतकरी, विद्यार्थी व बचत गटातील महिलांसह सामान्य जनतेलाही लाभ घेता येईल, असे निवेदन खासदार खडसे यांनी लोकसभा सभागृहात केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

SCROLL FOR NEXT