cane raswanti 
जळगाव

रसवंतीच्या चाकाचे घुंगरु जड...ऊस झाला पशुधनाचा चारा 

संजय पाटील

पारोळा (जळगाव)  : मागील वर्षाप्रमाणे यंदाही लग्नसराई व उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे ऊसाची रसवंती चालेल या अपेक्षेने शहरासह तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे रसवंती चालकांनी लाखो रुपयांचा ऊस खरेदी करुन ठेवला. परिणामी, मार्चमध्येच ‘कोरोना’चा प्रादुर्भावामुळे ताळेबंदी जाहीर झाली. लग्नसराईसह उन्हाळ्याची चारही महिने ताळेबंदीत गेली. त्यामुळे रसवंती चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरेदी केलेला ऊस अक्षरश: पशुधनासाठी चारा म्हणून विकण्याची वेळ रसवंतीचालकांवर आली आहे. 

राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबवून हळूहळू आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. महामार्गावरील दुकाने सुरू करण्याची मुभा दिली गेली. यात रसवंतीचालकांनी देखील हंगामाच्या अखेरीस का होईना व्यावसाय सुरू केला. परंतु तरी देखील नागरिक ऊसाचा गोडवा चाखायला फिरकत नसल्याची खंत बालाजी रसवंतीचे संचालक योगेश तुकाराम चौधरी यांनी व्यक्त केली. 
 
आर्थिक मदतीची अपेक्षा 
केंद्र सरकारने नुकतीच प्रधामंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली. यात फेरीवाले विक्रेत्यांसाठी खास खेळते भांडवल सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेत रसवंतीचालकांना समाविष्ट करुन त्यांना देखील खेळते भांडवल म्हणून ५० हजाराची मदत द्यावी, जेणेकरुन या पैशात ते जोड व्यवसाय करुन कुटुंब भागवतील. शासनाने मदत द्यावी, अशी मागणी रसवंतीचालकांनी केली आहे. 


संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT