PM kisan Nidhi Yojna
PM kisan Nidhi Yojna esakal
जळगाव

PM Kisan Yojana : ‘पीएम’ किसान योजनेचा लाभ ‘टपाल’मध्ये मिळणार; राज्यात मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana bank account linking aadhaar number facility available to villages through postman jalgaon news)

त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. यात जळगाव जिल्ह्यातील ३७ हजार ८८० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा होणार नाही.

लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आयपीपीबीमार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्टमास्तरमार्फत करून दिली आहे. यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकतर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांची खाते उघडलेली नाहीत, त्यांची खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

राज्यात मोहीम सुरू

पीएम किसान योजेनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाती सुरू करतील.

योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केल्याने ‘आयपीपीबी’मार्फत १ ते १२ फेब्रुवारीदरम्यान राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे. ‘आयपीपीबी’मार्फत राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावयाचे आहे.

ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपात्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील पोस्ट कार्यालयात असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज नाही, असे जळगाव विभागाचे डाकघर अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT