जळगाव

तर..अशा संबंधांना ‘राजमान्यता’ मिळण्याचा धोका!

सचिन जोशी

 जळगाव ः मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने अत्याचाराचे केलेले आरोप... त्यावर मुंडेंनी दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांसह अपत्यांची कबुली देण्यावरून मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादीचा पवित्रा स्वाभाविक असला तरी फडणवीसांची मुंडेंना ‘फेवर’ करणारी भूमिका आश्‍चर्यकारक आहे. मुंडेंचा दोष किती, यापेक्षा त्यांना मिळालेल अभय हे चुकीचा पायंडा पाडणारे तर आहेच... शिवाय, त्यातून भविष्यात सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कुणाच्याही बाबतीत अशा संबंधांना ‘राजमान्यता’ मिळण्याचा धोकाच अधिक आहे... 

गेला संपूर्ण आठवडा राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील अत्याचाराचा आरोप व त्यांच्या कथित विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणावरून चर्चेत राहिला. बॉलिवूडमधील ‘एन्ट्री’चे आमिष दाखवत अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या बहिणीशीच आपले संबंध असून, तिच्यापासून दोन अपत्ये आहेत आणि त्यांना नाव लावल्याचा कबुलीनामा मुंडेंनी दिला. त्यांच्या या विवाहबाह्य संबंधाची कुटुंबात व त्यांच्या मित्रपरिवारातही माहिती होती, ती त्यांनी केवळ जाहीरपणे मांडली, एवढेच. अर्थात, हे संबंध त्यांनी ‘कबूल’ केले नसते तरीही या प्रकरणाने ते बाहेर आलेच असते, हा भाग वेगळा. 

महाराष्ट्रानं स्वीकारायचा का?

पण, मुंडेंचे व त्यांच्या या ‘कबूल’नाम्याचे समर्थन करणारे महाभागही यानिमित्ताने समोर आले, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैवच. ज्या तरुणीने अत्याचाराचे आरोप केले, तिचे चारित्र्य, पार्श्वभूमी आणि कथित प्रकरणं बाजूला ठेवली तरी सार्वजनिक जीवनात मंत्रिपद भोगणाऱ्या नेत्याचे असे उघड विवाहबाह्य संबंध, त्यांचा ‘कबूल’नामा पुरोगामी महाराष्ट्रानं स्वीकारायचा का? हा प्रश्‍नच आहे. 

सखल चौकशी होणे गरजेचे

‘आपला तो बाळ्या’च्या म्हणीला जागत राष्ट्रवादीनं मुंडेंची पाठराखण करणं स्वाभाविक आणि शिवसेनेनं त्याला ‘होयजी..’ करणं अपरिहार्य आहे. पण, किरकोळ मुद्यांवरून अभ्यासपूर्ण भाषण ठोकत अंगात आणणाऱ्या विरोधी नेतृत्वानं, म्हणजे फडणवीसांनी मुंडेंना सांभाळण्याची बोटचेपी भूमिका घेणे न समजण्यासारखे व तेवढेच गंभीरही आहे. उलटपक्षी सत्तेत असूनही काँग्रेसने ‘आम्ही असतो तर राजीनामाच घेतला असता..’ असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे कान टोचले, हेदेखील महत्त्वाचे. 
परंतु, मुंडेंचे प्रकरण हे केवळ त्यांच्यापुरते अथवा मंत्र्याच्या विवाहबाह्य संबंधापुरते मर्यादित नाही. अशा प्रकरणांमध्ये काहीवेळा पीडित म्हणविणाऱ्या महिलाही स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकता, त्याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, हे करत असताना मुंडेंनी मंत्रिपदावर राहणं किंवा राष्ट्रवादी वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या पदावर राहू देणं.. हे या सांस्कृतिक राज्यात वेगळा पायंडा पाडणारं ठरेल. 

...तर कथित ‘सीडी’ही फुस्स! 
या प्रकरणात मुंडे किती दोषी आहेत किंवा नाहीत.. यापेक्षाही त्यांना अभय मिळाल्यामुळे भविष्यात सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कुणीही काहीही व्याभिचार केला तरी काही बिघडत नाही.. असा चुकीचा संदेश जाईल. जळगाव जिल्ह्यात जे कथित ‘सीडी’ प्रकरण गाजतंय, त्यात काही तथ्ये समोर आली, तर या ‘सीडी’चा बाँबही मुंडे प्रकरणाने फुसका बार ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT