girna dam  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘गिरणा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले; पाण्याचा गैरवापर करताना आढळून आल्यास कारवाई

गिरणा धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ९) सकाळी सहाला गिरणा धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

या आवर्तनमुळे भडगाव, पाचोरा शहरांसह १९० गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. (Two thousand cusecs of water was released from Girna Dam jalgaon news)

गिरणा धरणातून डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. दोन महिन्यांच्या खंडानंतर गिरणा पट्ट्यात पाणीटंचाईने डोके वर काढले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनही आर्वतन सोडण्याची मागणी होत होती.

त्यानुसार, गिरणा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी (ता. ९) सकाळी सहाला दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन कानळदा (ता. जळगाव) पर्यंत सोडण्यात येणार आहे.

भडगावला पुढील तीन दिवसात पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी १ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. हे पाणी बिगर सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा कोणीही गैरवापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देवेंद्र अग्रवाल यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT