Police recruitment 
Jobs

पोलिस दलातील 66 पदांसाठी लवकरच भरती

२०१९ मधील अर्जांवर लवकरच पोलिस भरती; खासगी एजन्सीद्वारे प्रक्रिया

- राजेश शेळके

रत्नागिरी : पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या अर्जांवर लवकरच पोलिस भरती होणार आहे. एका खासगी एजन्सीद्वारे ही प्रक्रिया होणार आहे. मात्र त्यावर पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. यामध्ये अनेक उमेदवारांच्या मेल आयडी, पासवर्ड बदलण्यास तसेच एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या वेबसाइटला जाऊन पासवर्ड व प्रवर्ग बदलाची प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) एस. एल. पाटील यांनी दिली.ऑनलाइन झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या अर्जांवर लवकरच पोलिस भरती होणार आहे.

ते म्हणाले, आगामी काळात लवकरच जिल्ह्यात पोलिस भरती होणार आहे. २०१९ मध्ये ६६ पदांसाठी जे उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावर ही भरती प्रक्रिया होणार आहे; मात्र त्याची तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. उमेदवारांच्या संपर्कात राहाता यावे, शासनाचे नवे धोरण त्यांना समजावे यासाठी पोलिस दलाचा हा प्रयत्न आहे. एकूण ६६ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामध्ये ३ पदे पोलिस बॅंडस्मन (शैक्षणिक पात्रता १० पास), ४४ पदे चालक पदासाठी (लायसन आणि १२ वी पास) तर इतर पदे शिपाई पदासाठी (१२वी पास) आहेत. अनेक उमेदवार मेल आयडी विसले आहेत, काही पासवर्ड विसले आहेत त्यांना वेबसाइटला जाऊन ती दुरुस्ती करता येणार आहे.

एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांच्या काही शंका असतील तर ०२३५२-२२२२२२-२७१२५७ या नंबवर संपर्क साधायचा आहे. उमेदवारांचे अर्ज गोळा करण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे होती. त्यामुळे एकूण किती उमेदवारी अर्ज आले हे सांगू शकत नाही; मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज आहेत. नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच वयोमर्यादा संपत आलेल्या उमेदवारांचाही विचार होण्याची शक्यता आहे, असे पाटील म्हणाले.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती; मात्र या वेळी पहिल्यांदा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होईल त्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. खासगी संस्थेवर या प्रक्रियेची जबाबदारी असली तरी त्यावर आमचे पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT