काही सुखद

गारगोटवाडीत थांबली पाण्यासाठीची भटकंती

सकाळवृत्तसेवा

कडूस - गारगोटवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायत सदस्य सावळाराम गारगोटे यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत पदरमोड करून आणून सोडले. तीव्र पाणी टंचाईच्या काळात दैनंदिन वापराच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गारगोटे यांच्यामुळे गैरसोय दूर झाली आहे. त्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

कुमंडला नदीवरील बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने बंधाऱ्यालगतच्या पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठल्याने परिसरात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू असलेली भटकंती पाहून गारगोटे यांनी पुढाकार घेतला व त्यांनी आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत आणून सोडले. विहीर पाण्याने काठोकाठ भरल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. 

स्वत: केला हजार फूट पाइपचा खर्च 
गारगोटे यांनी शेतापासून विहिरीपर्यंत सुमारे एक हजार फूट लांब पाइप जोडणी केली आहे. यासाठी परिश्रम घेऊन हजार फूट पाइपचा खर्च गारगोटे यांनी स्वतः केला. पुण्यात स्थायिक असलेले त्यांचे बंधू व चार्टर्ड अकाउंटंट किसन गारगोटे यांनी या कामी मोलाचे साहाय्य केले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी कोंडीभाऊ गारगोटे, एकनाथ गारगोटे, सरपंच अश्विनी बच्चे, उपसरपंच राहुल गारगोटे, ग्रामपंचायत सदस्य नेहा गारगोटे, सीमा गारगोटे यांनी गारगोटे यांना विशेष मदत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT