कऱ्हाड - राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मातीची भांडी विकत घेण्यापूर्वी नीता कुंभार यांच्याकडून त्याबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
कऱ्हाड - राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मातीची भांडी विकत घेण्यापूर्वी नीता कुंभार यांच्याकडून त्याबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. 
काही सुखद

आरोग्यदायी मातीच्या भांड्यांना साद

हेमंत पवार

कऱ्हाड - बचत गटाच्या माध्यमातून कुरवड्या, पापड, लोणची एवढ्यावर न थांबता लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने पोषक असलेले काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने तळबीड (ता. कऱ्हाड) येथील नीता संभाजी कुंभार यांनी स्वयंपाकासाठीची मातीची भांडी तयार करण्यास सुरवात केली. भांडी विक्रीसाठी त्याला वैष्णवी महिला स्वयंसाह्यता गटाची जोड दिल्यामुळे अल्पावधीच नावारूपास आलेल्या या व्यवसायामुळे त्यांच्या भांड्यांना राज्यातूनही मागणी वाढू लागली आहे. 

बाजारात जे विकते आणि ज्याला मागणी आहे ते दिल्यास ते विकते, हे नीता कुंभार यांनी स्वनिर्मितीतून दाखवून दिले आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी पती व कुटुंबीयांच्या सहकार्यातून संक्रांती, मडकी, मातीच्या मूर्ती तयार केल्या.

मात्र, त्याला जेमतेमच मागणी व्हायची. तेवढ्यावरच न थांबता आणि बचत गटाच्या कुरवड्या, पापड, लोणची निर्मितीतच न रमता नीताताईंनी जिद्दीच्या जोरावर कष्टाला साद घालत मातीची भांडी तयार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी पैशांची अडचण होती. ती सोडवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यादरम्यान त्यांना महिलांचा बचत गट सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांना कऱ्हाड पंचायत समितीमधील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका समन्वयक नीलेश पवार व विस्तार अधिकारी एस. बी. पवार यांनी सहकार्य केले. त्यांनी वैष्णवी महिला स्वयंसाह्यता गटाची स्थापना केली. त्यानंतर त्यांना व्यवसायासाठी पंतप्रधान रोजगार अंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाने तीन लाखांची कर्ज स्वरूपात मदत केल्याने त्यांनी जिद्दीने व्यवसायात लक्ष घालून स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी तयार कऱण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बाजारपेठेचा आणि मातीची भांडी कशी तयार करायची, याचा अगोदर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मातीची विविध प्रकारची टिकाऊ आणि आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी तयार करण्यास पती संभाजी कुंभार आणि कुटुंबीयांच्या मदतीने १६ वर्षांपूर्वी सुरवात केली.

सुरवातीला जुनी लोप पावलेली स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरण्याची संकल्पना सध्याच्या काळातील लोकांच्या मनात उतरवताना मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे त्याला मागणी कमी होत होती. मात्र, मातीच्या भांड्याच्या वापराबाबत लोकांमध्ये विविध पातळ्यांवर जागृती करण्यास प्रारंभ झाल्याने आणि मातीच्या भांड्यात भाजी-आमटी व अन्य पदार्थ केल्यामुळे लोह, मॅग्नेशियम व अन्य खनिजे आपोआप मिळतात आणि त्यातील जेवणाला एक वेगळीच चव असते, हे लक्षात येऊ लागल्याने लोकांकडूनही या भांड्यांना मागणी वाढली आहे. त्यांनी गेल्या १६ वर्षांत सुमारे दहा लाखांवर व्यवसाय केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची माणिनी जत्रा, माणदेशी प्रदर्शन, नक्षत्र प्रदर्शन, ज्योतिर्मय प्रदर्शन यासह कोल्हापूर, पुणे, सांगली, इस्लामपूर येथील शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात भाग घेऊन तेथेही मातीची भांडी पोचवली आहेत. 

नेत्यांनाही भुरळ 
नीताताईंच्या मातीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांची नेत्यांनाही भुरळ पडली आहे. त्यांची भांडी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले,  माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या नेत्यांसह पाटणचे अमरसिंह पाटणकर, ‘माणदेशी’च्या चेतना सिन्हा, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एऱम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व डॉक्‍टरांनी मोठ्या प्रमाणात वापरासाठी नेल्याचेही सौ. कुंभार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT