सातारा - येथील धनणीच्या बागेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी हितगुज करताना डॉ. अनिल पाटील. 
काही सुखद

कोमेजल्या जिवांना 'रयत'ची संजीवनी

दिलीपकुमार चिंचकर

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचा आधार
सातारा - पावसाने लागोपाठ दगा दिला. पेरलेल्या पिकाला कोंबच फुटले नाहीत. घर, शेतावर काढलेलं कर्ज वाढत गेलं. बा सारखा इचारात असायचा... एक दिवस बानं रात्री झोपायच्या आधी माज्या अन्‌ तायडीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. "बा'नं आईकडं बघितलं अन्‌ तोंड फिरवून त्यो झोपाय गेला. सकाळी जाग आली, ती आयेच्या हंबरड्यानं. माझा बाप घरातल्या तुळवीला लटकला हुता...

येथील धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगमध्ये "तो' आपली नजर शून्यात लावून बोलत होता. मराठवाड्यातील गोरख, विदर्भातील तुळसा अशा शेकडो मुलामुलींच्या, हृदयाला पीळ पाडणाऱ्या खऱ्याखुऱ्या कथा अनुभवायच्या असतील, तर साताऱ्यातील धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगला अवश्‍य भेट द्या. तळागाळातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन शिक्षित करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या बोर्डिंगमध्ये आता कर्जामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना रयत शिक्षण संस्थेने आसरा दिला आहे. शासनाच्या एका "पै'चीही अपेक्षा न करता या वाऱ्यावर असलेल्या मुलांच्या जीवनाची जबाबदारी आता संस्थेने उचलली आहे. गरिबीने, कर्जाच्या बोज्यामुळे फासाला लटकलेल्या, विष प्यायलेल्या शेतकऱ्यांच्या या मुलांच्या जीवनात आता आनंद भरला असून, ते केवळ"रयत'मुळे पारंब्यासमवेत हिंदोळा घेत आहेत.

गरिबांच्या मुलांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील धनणीच्या बागेत संस्थेचे पहिले वसतिगृह सुरू केले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांतील गरीब, अनाथ, एक पालकत्व असलेली मुले शिक्षण घेत असत. त्यासाठी शासनाकडून अल्पसा निधी मिळत होता. मात्र, गेल्या वर्षी शासनाच्या एका अध्यादेशाच्या फटकाऱ्याने वसतिगृह बंद करावे लागले. गरिबांच्या सर्व मुलांना शिक्षण सोडून घरी पाठवावे लागले. मात्र, कर्मवीरांचे हे ऐतिहासिक वसतिगृह स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला.

विदर्भ- मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची शेकडो मुले निराधार झाली आहेत. तेथील मुलांना या वसतिगृहात आणून त्यांच्या शिक्षणाची आणि जगण्याची सर्व जबाबदारी घ्यायचे "रयत'ने ठरविले. निराधार झालेल्या त्या मुलांचा शोध संस्थेने घेतला. त्यांना तेथून आणले. सध्या या वसतिगृहात राहून 20 मुली आणि 21 मुले शिक्षण घेत आहेत. कित्येक वर्षे "भूक'ही पचवलेल्या या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी संस्थेने घेतली असून, ती आता भरल्या पोटी शिक्षण घेऊ लागली आहेत.

'शाहू बोर्डिंग हे कर्मवीरांचे पहिले वसतिगृह. ते बंद पडणे कोणालाही रुचणारे नव्हते. म्हणून आम्ही ते स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता विदर्भ- मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला आहे. त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. समाज आम्हाला त्यासाठी निश्‍चित मदत करेल.''
- डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT