कोकण

काजूला किलोला १५५ चा दर

तुषार सावंत

कणकवली - कडाक्‍याच्या थंडीनंतर प्रचंड प्रमाणात मोहरलेल्या काजूंना निसर्गाच्या बदलामुळे यंदा चांगलाच फटका बसला. हंगामाच्या सुरवातीलाच काजूचा दर किलोला १५० ते १५५ रुपयांपर्यंत अडकून पडला आहे. आजच्या आठवडा बाजारात काजूची आवक वाढली असली तरी समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी बागायतदार संकटात आहे. 

सिंधुदुर्गातील काजूच्या उत्पन्नातून मोठी आर्थिक उलाढाल होते. शेतकरी बागायतदारांना आपल्या वर्षाचा खर्च भागविण्यासाठी काजूला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असते. यंदा केंद्र शासनाने ४५ टक्के आयात शुल्क विदेश काजूच्या खारवलेल्या आणि भाजलेल्या गरांसाठी लागू केला.  देशांतर्गत काजू पिकाला संरक्षण मिळून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु हंगामातील काजूच्या घाऊक खरेदीला सुरवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात १५० वरून आज किलोचा दर १५५ इतका आला होता. जिल्ह्यात दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला हा भाग वगळता उर्वरित भागातील काजूला फारसा दर मिळत नाही. यंदा १५५ ने काजू खरेदी करायला या आठवड्यात सुरवात झाली असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक न झाल्याने दर निश्‍चित झालेला नाही. गतवर्षी काजूच्या प्रतवारीनुसार ११० रुपये दर मिळत होता. यंदा गरजू शेतकऱ्यांनी आपल्याकडे साठविलेला हळवा काजू बाजारातील घाऊक व्यावसायिकांना विकला आहे. 

जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेली काजूची उलाढाल यंदा आशादायी असेल असे चित्र आहे. आयात शुल्क वाढविल्याने विदेशी काजू फारसा खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे कर्नाटक, केरळबरोबरच कोकणातील काजूला चांगली मागणी राहील. त्यामुळे १५० वरून १७५ रुपयांपर्यंत तरी किलोचा दर राहील, असे शेतकरी बागायतदारांना वाटत आहे. त्यामुळे गरजू वगळता मोठ्या उत्पादकांनी अजूनही बाजारात काजू विक्रीसाठी आणलेला नाही.

दर गोव्यावर अवलंबून
जिल्ह्यात काजूला चांगले उत्पादन असले तरी बाजारभाव हा पूर्णतः गोव्याच्या बाजारपेठेवर अवलंबून असतो. काजूचा घाऊक व्यापारीवर्ग हा दोडामार्ग, बांदा परिसरांतील असल्याने याच परिसरात काजूच्या खरेदीचा दर निश्‍चित होतो. जिल्ह्यात यंदा नैसर्गिक संकटाने काजूच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. थंडीच्या कालावधीत बहरलेल्या काजूचा ढगाळ वातावरणाने मोहोर करपल्यामुळे उत्पन्नावर थेट परिणाम झाल्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT