360 Cores Fund Approved For Konkan Uday Samant Comment  
कोकण

मंत्री उदय सामंत म्हणाले,  कोकणसाठी इतका निधी मंजूर 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी 360 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीला 150 कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात 93 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत, शिवाय मदतीचे वाटप देखील सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे नुकसान झालेली आहे. यामुळे कोकण आयुक्त यांनी शासनाकडे 360 कोटी रुपये निधीची मागणी केली होती. ती मागणी काल मुख्यमंत्री यांच्यासमवेत आपल्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्याता दिली. आज हा निधी वर्ग होईल. जी कुटुंबे बाधित आहेत. त्यांच्या बॅंक खात्यात हा निधी पडणार आहे. जिल्ह्यामध्ये 794 गावे बाधित झालेली आहेत. मात्र जीवित हानी झालेली नाही. जिल्ह्यामध्ये 1770 घरे पूर्णपणे जमिनदोस्त झाली असून 41 हजार 306 अंशतः बाधित झाली आहेत. जिल्ह्यांमध्ये 1871 गोठे, 756 दुकाने बाधित झाली असून 94 जनावरे दगावली आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

PM Narendra Modi: तेजस्वी यांच्या नावाला सहमती नव्हती; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

SCROLL FOR NEXT