Railway  SAKAL
कोकण

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे ८७ टक्के विद्युतीकरण

रोहा ते वेरणा मार्ग : वर्षाला २०० कोटींची बचत; युद्धपातळीवर काम सुरू

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोकण रेल्वे आता लवकर विजेवर धावणार असून, रोहा ते वेरणा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे १ हजार १०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. सध्या पहिल्या टप्प्यात दिवा ते रत्नागिरी मार्गावर पहिली पॅसेंजर धावू लागली आहे.

भारतीय रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. देशातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे मार्गावर केले जात आहे. मागील वर्षी रोहा ते रत्नागिरी रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले. पुढे कारवार ते ठोकूर येथील विद्युतीकरणाची काम अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरी ते कारवार या विभागातील काम युद्धपातळीवर चालू असून पहिली चाचणीही झाली आहे. या मार्गावरील बोगद्यामधील विद्युत यंत्रणा टाकण्याचे काम चालू आहे. ही कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची वार्षिक २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. सध्या डिझेलवर रेल्वेचा ३०० कोटी रुपयांचा खर्च दरवर्षी होतो. विजेवर गाड्या सोडण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च लागू शकतो. आणखी एक फायदा म्हणजे विद्युतीकरणामुळे प्रदूषण टळणार आहे.

कोकण रेल्वेचा मार्ग जंगलातून गेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे विद्युत प्रवाह खंडित (वायर ट्रिपिंग) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडित झाला की गाडी १०० मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्चित करून तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवली जाणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला एखादे इंजिन निकामी झाले. तर, पिगबॅक करायला बॅकअप डिझेल इंजिन तयार ठेवणे आवश्यक असल्याने यावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून कामे सुरू आहेत.

प्रवास होणार वेगवान

कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे कामही युद्धपातळीवर होत आहे. रोहा पासून पुढे काही ठिकाणी दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही रेल्वे स्थानकादरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे.

दृष्टिक्षेपात...

  • २०१६ मध्ये विद्युतीकरणाला मंजुरी

  • ४४३ कि.मी.चे विद्युतीकरण पूर्ण

  • रोहा ते रत्नागिरी २०४ कि.मी. पूर्ण

  • कारवार ते ठोकूर २३९ कि.मी. पूर्ण

  • एकूण १ हजार १०० कोटी खर्च अपेक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT