कोकण

रिफायनरी समर्थकांवर बहिष्कार घालणाऱ्यांकडून दिलगीरी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - रिफायनरीच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला होता म्हणून काही लोकांनी गोठिवरेतील कुटुंबीयांवर बहिष्कार घातला होता. बहिष्कार घालणाऱ्यांनी आपली चूक मान्य केली व यापुढे असा प्रकार होणार नाही,असे आश्‍वासन दिले. त्यामुळे पोलिसांनी सध्या हे प्रकरण सामंजस्याने मिटविले. 

राजापूर तालुक्‍यातील गोठिवरे येथे राहणारे सूर्यकांत पुजारी, महादेव येरम, व अनाजी खांबल आदी कुटुंबीयांनी त्यांच्यावर गावातील बहिष्कारायाबाबत पोलिसांकडे धाव घेतल्यावर नाटे येथील पोलिस निरीक्षक काळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. बहिष्कार घालणाऱ्यांना समज दिली. 
रिफायनरी समर्थनार्थ मोर्चानंतर गावातील गणपती मंदिरात काही लोकांनी मुंबई येथील लोकांच्या सांगण्यावरून सभा घेतली व ज्या लोकांनी रिफायनरीचे समर्थन केले आहे त्यांच्याकडे कोणीही कामाला जावू नये व त्यांच्याशी बोलू नये असे सांगितले.

जो कोणी या गोष्टीचा भंग करेल त्याचेकडून 5 हजार रूपये दंड आकारण्यात यावा असे ठरविले. या कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वा धार्मिक निमंत्रण देण्यात येवू नये,असा निर्णय घेण्यात आला.

याबाबतची तक्रार लेखी केली. या घरातील लोक रस्त्यावरून जात असता त्यांचे मोबाईलवरून फोटो काढले जातात. या कुटुंबियांनी मंदिरात दिलेले साहित्यही न वापरता तसेच ठेवण्यात आले व या लोकांनी दिलेली वर्गणीसुद्धा स्वीकारण्यात आली नाही. या कुटुंबाकडे कोणीही लोक दहशतीमुळे कामाला येत नसल्यामुळे कुटुंबे एकाकी पडली होती. त्यामुळे काही मुंबईला गेले. उर्वरित कुटुंबे जीव मुठीत धरून रहात होती परंतु या कुटुंबानी या बहिष्कारासारख्या निर्णयाविरोधात पोलिसांकडे दाद मागण्याचे ठरविले. रिफायनरीसाठी समर्थन देणाऱ्या कुटुंबाच्या वतीने या भागातील सामाजिक नेते व रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

दहशतीचे प्रकार इतरत्रही 
रिफायनरी परत यावी यासाठी इतर गावातल्या लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या गावातही असे दहशतीचे प्रकार चालू असल्याचे स्थानिक नेते अविनाश महाजन यांनी सांगितले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT