कोकण

समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद

सकाळवृत्तसेवा

दिवेआगर - हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.  

श्रीवर्धन तालुक्‍यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर या किनाऱ्यांवर नौकानयन, जलक्रीडेची सुविधा आहे. सध्या पॅराग्लायडिंग सेवा बंद आहे. मेरिटाईम बोर्डाच्या आदेशानुसार २६ मे पासून जलक्रीडा बंद करण्यात येणार आहे. या बोटींच्या मालकांना मेरिटाईम बोर्डाकडून डिसेंबर ते २५ मे अशी परवानगी देण्यात येते. २५ मे नंतर मॉन्सून दाखल होण्याच्या पूर्वी  खोल समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारचे नौकानयन, जलक्रीडा पूर्णपणे बंद करण्यात येतात. काही बोटींचे मालक २५ मे नंतरही बेकायदा या सेवा सुरू ठेवून पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सर्व प्रकारचे नौकानयन २५ मे नंतर थांबवण्याचे आदेश संबंधित परवानाधारकांना देण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
- रजनीकांत पेके, बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT