Crime News Team eSakal
कोकण

'5 लाख रुपये आण, नाहीतर तू घरात राहायचे नाही'

सकाळ वृत्तसेवा

काही महिने सुखाचा संसार केल्यानंतर सदर महिलेला पती, सासू आणि नणंद या तिघांनी त्रास देण्यास सुरवात केली.

लांजा : लांजा शहरातील अगरवाडी येथे विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण करीत पाच लाखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या विवाहितेचा पती, सासू व नणंदेविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ जानेवारी २०२१ रोजी आगरवाडी येथे राहणारे गौरव सावंत यांच्याबरोबर माया सावंत या युवतीने लग्न केले होते. काही महिने सुखाचा संसार केल्यानंतर सदर महिलेला पती, सासू आणि नणंद या तिघांनी त्रास देण्यास सुरवात केली. सुरवातीला भांडण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते; मात्र त्यानंतर सदर महिलेला मारहाण करून मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. एवढ्यावरच न थांबता शेवटी तिला उपाशी ठेवून तिचा जाच करण्यास सुरवात केली आणि तू आपल्या माहेरहून पाच लाख रुपये आण नाहीतर मोठा हुंडा घेऊन माझ्या मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न करून देईन, असे धमकावण्यात आले.

माझे बाबा पैसे कुठून देणार, अशी सदर विवाहिता वारंवार विनंती करूनदेखील घरातील माणसे ऐकण्यास तयार नव्हती. पाच लाख रुपये आण नाहीतर तू घरात राहायचे नाही, असे सांगून सदर महिलेला लग्नाच्यावेळी अंगावर घातलेले स्त्रीधन काढून घेऊन तिला माहेरी पाठवून देण्यात आले. अशा प्रकारची फिर्याद सदर महिलेने लांजा पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पती गौरव सावंत, सासू माया सावंत व नणंद तेजश्री सावंत या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अद्याप संशयिताना अटक केलेली नाही. अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Latest Live Updates Marathi : 'पेपरफुटी हा आता पॅटर्न झालाय', अभिषेक बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त आवर्जून भेट द्यावी अशी भारतातील पवित्र ठिकाणे!

SCROLL FOR NEXT