criticized by vinayak rane on vaibhav naik on the topic of political atmosphere in sindhudurg 
कोकण

'राणेंच्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांनी आता फक्त अस्तित्वाचीच काळजी करायची'

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : संजय पडते, सतीश सावंत ही आधीच हद्दपार झालेली टोळी आहे. राणेंच्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांनी आता फक्त राजकीय अस्तित्वाचीच काळजी करावी, असा इशारा येथील भाजप मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी दिला.

राणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की ज्यांची राजकीय ओळख हीच नारायण राणे नावाच्या सूर्यामुळे आहे. संजय पडते, सतीश सावंत यांच्यासारख्यांना नियती कधीच माफ करणार नाही. राणे ही व्यक्ती नव्हे तर विकासाचा विचार आहे. त्यामुळे त्यांच्या-बाबतचा द्वेष तुमच्यावरच पलटणार आहे. राणे यांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा याच संजय पडते आणि सतीश सावंत यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. काळाच्या ओघात सूर्याजी पिसाळ उघडे पडले आहेत. वास्तविक हे जर सच्चे असते तर या पराभवाची जबाबदारी घेऊन त्यांनी राजकारणातुन संन्यास घेऊन घरात बसायला हवे होते; पण हाव सुटलेल्या पिसाळांना थार कुठला होतोय? राणे 
यांच्या सोबत ज्या सन्मानाने वावरत होता तो आज तुम्हाला मिळतोय का हे स्वतःलाच विचारा आणि मगच तोंड वर करून फिरा.

राणेंना हद्दपार करण्याच्या गोष्टी करणाऱ्या सतीश सावंतांना तर यापूर्वीच कणकवलीतुन एकदा आणि त्यांच्या आंब्रड मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकांनी हद्दपार करून टाकलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतून त्यांची हद्दपारीही अशीच निश्‍चित आहे. संजय पडते यांना तर तिकडे पार देवगडचे जिल्हाध्यक्ष पद देऊन पक्षाने इकडे त्यांच्या होमटाऊनमध्ये डोक्‍यावर वैभव नाईकांना आणून बसवले आहे. हाच तुमच्यावर असलेला विश्‍वास. 

नाईकांनी राजीनामा द्यावाच !

वैभव नाईक यांनी २०२४ च्या गमजा मारण्याची काही गरजच नाही, हिंमत असेल तर आताच राजीनामा देऊन मैदानात उतरुन दाखवावे. कुडाळ मालवणमधून नाही त्यांचा बाडबिस्तारा गुंडाळून पार्सल कणकवलीत पाठवल तर राजकारण सोडेन. हिंमतीच्या बाता करणाऱ्या आमदार नाईक यांनी राजीनामा द्यावाच, असे आव्हान राणे यांनी केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT