damage to agriculture from cows banda konkan sindhudurg 
कोकण

लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश, जाणून घ्या कारण

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - पाडलोस-देऊळवाडी येथील युवा शेतकरी विशाल गावडे यांची पानतळी येथील भातशेती गव्यांनी फस्त केल्याची घटना घडली. वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश झाला आहे. 

श्री. गावडे यांच्या कुटुंबाने अपार कष्ट करत यावर्षी भातशेती केली होती. नांगरणी, मजुरी, भातबियाणे, खत यावर खर्च करत स्वतः शेतीत राबून योग्यप्रकारे लावणी केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने बेरोजगार झालेल्या श्री. गावडे यांनी स्वतः कष्टाने शेती पिकविली होती; परंतु गव्यांनी एका रात्रीत त्यांची भातशेती फस्त केल्याने दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली.

यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता काय करायचे? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. पाडलोस गावात रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे अद्यापही शेकडो एकर जमीन पडीक आहे. जर प्रशासनाने रानटी प्राण्यांचा बंदोबस्त केल्यास शंभर टक्के जमीन लागवडीखाली येईल व शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील; परंतु प्रशासनाने यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची आज गरज असल्याचे मत पाडलोसवासीयांमधून व्यक्त होत आहे.

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Fine: एसटी बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करणार! MSRTC चा मोठा निर्णय, काय कारवाई होणार?

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय सांगितलं?

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

SCROLL FOR NEXT