कोकण

वाशिष्ठीतील गाळ काढण्याची मागणी मान्य

बुधवारी घोषणा अपेक्षित; चिपळूणकरांच्या लढ्याला यश

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणकरांनी सुरू केलेल्या लढ्याला मोठे यश आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील बैठकीत दीड तास चर्चेअंती चिपळूणवासीयांची मागणी मान्य केली. बुधवारी (ता. १५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अल्प आणि दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात वाशिष्ठीतील गाळ काढण्याच्या निर्णयावर सर्व मंत्र्यांनी बैठकीत शिक्कामोर्तब केले असून त्याला बुधवारी मूर्त स्वरूप मिळणार आहे.

चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री थोरात यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, ‘‘गाळ काढावाच लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महसूलचा विषय असेल तो निश्चितपणे युद्धपातळीवर हाताळला जाईल. जुवाडे, बेटे ताब्यात घेऊन ती काढून टाकण्याची कार्यवाही त्वरित करू.’’ वेळ फार कमी आहे. त्यामुळे तातडीने या कामाला सुरुवात झाली पाहिजे, असे सांगत गाळ काढण्याला पूर्णतः मान्यता दिली.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘विषय फार गंभीर आहे. मी स्वतः पाहणी केली आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण विभाग पूर्ण तयार असून कोणतीही अडचण येणार नाही. जे लागेल ते सर्व सहकार्य मी करेन. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सुरवातीला ५ महिने व नंतर दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात गाळ काढण्याचे प्रयोजन करू या. माझ्या विभागाच्या सर्व परवानग्या मी लगेच देतो.’’

जलसंपदामंत्री म्हणाले, ‘‘मी प्रत्यक्षात या संदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. यांत्रिक विभागाला आदेश दिलेले आहेत. माझ्याकडून पूर्ण सहकार्य राहील. मी तत्काळ सर्व यंत्रसामुग्री पाठविण्याची व्यवस्था करतो.’’ अस्लम शेख म्हणाले, ‘‘मेरीटाईम विभागाकडूनदेखील कोणतीच अडचण येणार नाही. तशा सूचना मी आजच देतो.’’ आमदार शेखर निकम, तसेच मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली.

समितीला ठाम आश्वासन

वाशिष्ठीतील गाळ काढणे या विषयावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या पूर्वी पुन्हा सर्व संबंधित मंत्री व अधिकारी एकत्र बसून प्रस्ताव तयार करतील व अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर ठेवून निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन चिपळूण बचाव समितीला यावेळी देण्यात आले. त्यावर तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून शासनाकडून लेखी ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका चिपळूण बचाव समितीतर्फे अरुण भोजने, शहनवाज शहा, राजेश वाजे, सतीश कदम व किशोर रेडीज यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT