पुणे : धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने कालपासून मुळा-मुठा नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यंदा खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे चारही धरणे काठोकाठ भरली होती. परिणामी, खडकवासला धरणातून आतापर्यंत १३.७९ टीएमसी पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला आहे. या चारही धरणांमधून पुणे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाणीसाठा आणि पाणीपातळीचा आढावा घेत विसर्ग बंद करण्यात आला आहे.