demand of mayor of rashtrawadi in ratnagiri if maha vikas aghadi in ratnagiri 
कोकण

'शिवसेनेने जागा दिल्या तरच महाविकास आघाडीचा विचार करू'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथील पालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने सन्माननीय जागा दिल्या तरच आम्ही महाविकास आघाडीचा विचार करू. अपेक्षा ठेवणार नाही. मात्र, आघाडी झाली तर अडीच-अडीच वर्षे नगराध्यक्षपद मागणारच, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुझा यांनी मांडली.

‘राष्ट्रवादी’ संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुकांमध्ये हा फॉर्म्युला वापरण्याच्या हालचाली दिसत आहेत. शिवसेना ६०, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २० टक्के जागा असे सूत्र ठरणार असल्याची चर्चा कानावर आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून धोरण निश्‍चित झालेले नाही. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सन्माननीय जागा दिल्या तर आघाडी जरूर करू.

यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर काहींच्या बैठका झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्या अधिकृत नसाव्यात. अधिकृत झाल्या असत्या तर मी आणि सुदेश मयेकर त्यात नक्कीच असतो. याबाबत प्रदेशाध्यक्षांच्या कानावर हा विषय घालून पुढील निर्णय घेतला जाईल. शिवसेनेकडून आम्ही अपेक्षा ठेवणार नाही. आम्हीही तयारी केली आहे, असेही मुर्तुझा म्हणाले. 

सुर्वे किंवा कोतवडेकर होणार तालुकाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावरही ही गोष्टी घालण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर इच्छुकांपैकी एक नाव निश्‍चित करून कळवा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राजन सुर्वे आणि सचिन ऊर्फ बबलू कोतवडेकर या दोघांची नावे रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी कळविण्यात आली आहेत. लवकरच त्यापैकी एकाची घोषणा होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविमा परतावे नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच, योजना आहे तरी कुणासाठी?

Pune Crime News : पुण्यात धारदार हत्यारांनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मध्ये घेण्यात घेणार विशेष मेगा ब्लॉक

Grain Export: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! गहू-साखर निर्यातीला सरकारकडून मंजुरी; कृषी निर्यातीत नवा अध्याय

Farmer Death : विदर्भात २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT