election of grampanchayat in ratnagiri BJP plan for this election in ratnagiri
election of grampanchayat in ratnagiri BJP plan for this election in ratnagiri 
कोकण

निवडणुकीसाठी भाजप आखतंय व्यूहरचना

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पक्षीय संघटन वाढवण्यासाठी उत्तर व दक्षिण असे दोन भाग भाजप नेतृत्वाने केले. याला आता वर्ष होत असून दोन्ही ठिकाणी भाजपचे काम वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात हजारो नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली. विविध मोर्चे, आघाड्यांच्या नियुक्‍त्या झाल्या. यामध्ये तळागाळापासून जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची वर्णी लागली. आता लक्ष ग्रामपंचायत निवडणुकांवर असून त्याची व्यूहरचना भाजपने सुरू केली आहे.

चेहरा बदललेली भारतीय जनता पार्टी अधिक प्रभावी पद्धतीने कार्यरत झाली आहे. उत्तरमध्ये डॉ. विनय नातू व दक्षिणमध्ये ॲड. दीपक पटवर्धन या जुन्या जाणत्या नेत्यांना संधी मिळाली. गेल्या दहा वर्षांत भाजपमध्ये जिल्हास्तरीय नेतृत्वात फारसे बदल झाले नव्हते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दक्षिण रत्नागिरीत ३०० हून अधिक कार्यकर्ते मदत करत होते. त्यांनी ६३ हजार नागरिकांना शिधा, मास्क वाटप केले. नवीन टीम विविध उपक्रम राबवत आहे.

जिल्हा कार्यकारिणीचे गठन, पाचही मंडलातील कार्यकारिणी गठन, विविध मोर्चा, आघाडी अध्यक्ष आदींच्या नियुक्‍त्या ॲड. पटवर्धन यांना केल्या. पीएम केअर फंडासाठी ५३०० लोकांकडून निधी गोळा केला. श्री राम जन्मभूमी शीलान्यास आनंदोत्सव, पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती यासारखे कार्यक्रम राबवले. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी केलेला संपर्क, प्रत्येक मंडलात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे या कार्यक्रमातून संघटनात्मक पकड मजबूत करण्यावर भर दिला आहे.


मोठी परीक्षा...

चिपळूण नगरपालिका व देवरुख नगरपंचायत वगळता कोणतेही यश भाजपला पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे नेतृत्वाने नवा गडी नवे राज्य करण्याचे ठरवले. आता ग्रामपंचायत निवडणुकीत आता त्यांची मोठी परीक्षा होणार आहे. 

जनतेच्या अडचणी सोडवा

भाजपने पक्षीय व्यवस्थात्मक जबाबदारी दिली. नेतृत्व बदल हा व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे. केंद्रात आपली सत्ता असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने लक्ष घाला आणि नवा-जुना वाद करण्यापेक्षा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या, असे स्पष्ट मत जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT