सिंधुदुर्ग : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याने काल त्याच्या भाषणात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. त्याच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे टीका केली आहे. शरजील नावाच्या कारट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो हे आम्ही दाखवुन देऊ, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
ते म्हणाले, आत्तापर्यंत या घटनेला ७२ तास उलटून गेले तरी केवळ एफआरआय दाखल झाला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर चोवीस तासांमध्ये त्याच्यावर कारवाई झाली असती. सरकारला शिक्षा द्यायला जमत नसेल तर त्याला फक्त आमच्याकडे सोपवा. समस्त हिंदू समाज काय करू शकतो हे त्या सडक्याला आमच्या भाषेत समजून सांगु. महाविकास आघाडीला आणि प्रामुख्याने हिंदुत्वाचा गवगवा करणाऱ्यांना काहीतरी वाटायला हवे. एक कोणतरी युवक महाराष्ट्राच्या भूमीवर येतो आणि असं वक्तव्य करतो. हिंदू समाजाला भारतात अगर महाराष्ट्रात येऊन कुणी आव्हान करत असेल तर त्याचा काय कार्यक्रम करायचा हे आमच्याकडे ठरले आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.
हेही वाचा - बापाच्या हातावरच तिने घेतला अखेरचा श्वास मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याचाही जागीच अंत
मी ट्विट करून आव्हान केलंय की सरकारला त्याच्यावर कारवाई करायला जमत नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. एल्गार काय असतो ते ही दाखवून देऊ. त्याच्या जिभेच काय करायचं आहे ते ही दाखवून देऊ जेणेकरुन भविष्यात आमच्या हिंदूंना कोणी बोलणार नाही.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.