कोकण

कोकणातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले - चिबुड, कणगी या पिकांना भाजीपाला पिकांमध्ये समाविष्ट करून आंबा, काजू फळ पिकांप्रमाणे निकष लावण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वेतोरे येथे दिले.

कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्‍यातील वेतोरे येथील भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी नुकसानीसंदर्भात चर्चा केली. पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, उपसभापती स्मिता दामले, भाजप तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेतोरे सरपंच राधिका गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, साईप्रसाद नाईक, सचिन वालावलकर, अजित राऊळ, बाळा सावंत आदी उपस्थित होते.

वेतोरे गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिबुड कणगी व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते; मात्र यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या सर्व पिकाचे नुकसान झाले. या पिकाची शासनदरबारी कोठेही नोंद नसल्याने नुकसानभरपाई मिळत नाही.

डॉ. बोंडे पुढे म्हणाले, ‘‘यावेळच्या पुराची भीषणता अधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यानी संवेदनशील भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवून १० हजार प्रतिकुटुंब नुकसानभरपाई देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी पतंप्रधान किसान पेन्शन योजना, गोपीनाथ मुडे विमा योजना आदींचा लाभ घ्यावा. कृषी सहायकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोचवाव्यात.’’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT