KOKAN SAKAL
कोकण

वृक्षतोड बंदीला शेतकरी संघटनेचा विरोध

दाद मागणार; जिल्ह्यात ९९.९८ टक्के खासगी क्षेत्र, शासकीय परवानगीनेच कृती

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : जल, वन, जमीन या संपत्तीवर शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांचा हक्क आहे. या संपत्तीवर कोणीही गदा आणण्याचा प्रयत्न करू नये. कोणी असा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकरी शासनदरबारी दाद मागू, असा इशारा रत्नागिरी जिल्हा शेतकरी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला असून वृक्षतोड बंदी झाली तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याला राहते घर, परडे सोडल्यास कोणतीही जमीन शेतकऱ्याच्या हातात राहणार नाही, असा दावा केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पूर्ण जमिनीला वनसंज्ञा लागू होईल व त्यांची नियमावली लागू होईल. जल, जंगल, जमीन यावरती शासनाच्या नियमावलीप्रमाणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्याच्यावर कोणीही गदा आणणेचा प्रयत्न करू नये तसेच करण्याचा प्रयत्न केल्यास शासन दरबारी आम्ही दाद मागू.

काही वर्षांपूर्वी माजी वनमंत्री स्व. पतंगराव कदम यांच्यापर्यंत काहींनी वृक्षतोडीसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. यानुसार वृक्षतोडबंदीची घोषणादेखील करण्यात आली; मात्र शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. जंगल हे शेती म्हणून शासनाने रीतसर जाहीर केले आहे व त्यावरील बाहेरगावी किटा, जळण, इमारती लाकूड बाहेर जाते. त्यावेळेच त्यांच्याकडून रीतसर कर घेतला जातो व कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीकडून कर घेतला जातो, याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पालांडे, संजय थरवळ, अनंत पवार, महेश शिंदे आदींनी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT