fish traders ignored anaculture in ratnagiri 
कोकण

मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरविली. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे ८ लाखांचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. यंदा फक्त २३ तलावांचा लिलाव होऊन पावणेचार लाखांच्या महसुलावर मत्स्य खात्याला समाधान मानावे लागले आहे. 

मत्स्यबीज तयार न होणे, तलावात सूक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणीचा अभाव आणि मासे पकडण्यासाठी कामगार न मिळणे अशा अनेक अडचणींमुळे गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होती. त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्‍टरी ३०० रुपये याप्रमाणे तलावाचा लिलाव होतो.

सुमारे १०० ते १२० हेक्‍टरचे तलाव आहेत. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक त्यामध्ये माशाचे बीज सोडतात; मात्र बहुतेक तलाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दऱ्या-खोऱ्यातील पाणी वाहत राहते. त्यामुळे तलाव भरून उलटून वाहत राहतात. त्यामुळे बहुतांशी पिल्ली वाहून जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्‍यक असणारे सूक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खाऱ्या पाण्यातील माशांप्रमाणे चव नसते.

"जिल्ह्यात तलावातील मत्स्य शेतीला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी तरुण व्यावसायिकांनी वेगळा प्रयोग करावा."

- एम. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य संचालक, रत्नागिरी

संपादन -  स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT