fish traders ignored anaculture in ratnagiri 
कोकण

मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरविली. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे ८ लाखांचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. यंदा फक्त २३ तलावांचा लिलाव होऊन पावणेचार लाखांच्या महसुलावर मत्स्य खात्याला समाधान मानावे लागले आहे. 

मत्स्यबीज तयार न होणे, तलावात सूक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणीचा अभाव आणि मासे पकडण्यासाठी कामगार न मिळणे अशा अनेक अडचणींमुळे गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होती. त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्‍टरी ३०० रुपये याप्रमाणे तलावाचा लिलाव होतो.

सुमारे १०० ते १२० हेक्‍टरचे तलाव आहेत. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक त्यामध्ये माशाचे बीज सोडतात; मात्र बहुतेक तलाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दऱ्या-खोऱ्यातील पाणी वाहत राहते. त्यामुळे तलाव भरून उलटून वाहत राहतात. त्यामुळे बहुतांशी पिल्ली वाहून जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्‍यक असणारे सूक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खाऱ्या पाण्यातील माशांप्रमाणे चव नसते.

"जिल्ह्यात तलावातील मत्स्य शेतीला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी तरुण व्यावसायिकांनी वेगळा प्रयोग करावा."

- एम. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य संचालक, रत्नागिरी

संपादन -  स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Drowning Accident: पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू; लाव्हा येथील घटनेने समाजमन सुन्न

Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 3 दिवस कसे असेल हवामान?

Student Survey: 'सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण'; गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

Amravati Crime: महिलेची गळा आवळून हत्या; कपड्याने हातपाय होते बांधलेले

SCROLL FOR NEXT