flight service of ratnagiri people less possibilities from flight travel said MP vinayak raut in press conference of ratnagiri 
कोकण

रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न धूसरच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न धूसर झाले आहे. तटरक्षक दलाच्या येथील विमानतळावरून सुरू होणाऱ्या खासगी विमानसेवा निकषांमध्ये अडकण्याची शक्‍यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेसेवेमुळे मुंबई चार तासांच्या अंतरावर येईल. मात्र, वाढीव धावपट्टीला जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे रत्नागिरी विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. याला खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. 

रत्नागिरीतील हवाई वाहतुकीची भरारी आता दूर नाही, लवकरच ही हवाई सेवा सुरू होणार, असे वारंवार लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात होते. तटरक्षक दलाच्या तळाचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात दलाची विमाने येथे लॅण्ड होतील त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन दोन महिन्यांत खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल, असे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते.

पूर्वी रत्नागिरी-मुंबई ही हवाई सेवा सुरू होती, मात्र ती बंद पडली. तेव्हा एमआयडीसीच्या ताब्यात रत्नागिरी विमानतळ होता, मात्र आता हे विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोकणातील मोठा तळ येथे उभारला जात आहे. या ठिकाणी विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी वाढविण्याची गरज होती. काही कोटी रुपये खर्च करून तटरक्षक दलाच्या या तळाचे विस्तारीकरण सुरू आहे, मात्र वाढीव धापट्टीला स्थानिकांनी संमती न दिल्याने हे काम रखडले आहे. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंबई चार तासांवर येणार 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबई चार तासांवर येईल. रेल्वेमुळेही हे अंतर कमी झाले आहे. शॉर्ट डिस्टन्स झाल्याने रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी झाली. त्यात सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. याचा सारासार विचार करून रत्नागिरी विमानतळावर खासगी सेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT