कोकण

रत्नागिरी शहरात पावणेतीन किलो गांजा जप्त

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - शहरातील राहुल कॉलनी परिसरात पोलिसांनी काल रात्री छापा टाकून ४६ हजार रुपये किमतीचा पावणेतीन किलो गांजा जप्त करून ५ संशयितांना अटक केली.

शहर पोलिस ठाण्याजवळ ही कारवाई झाली. यापुढे दुर्लक्ष केलेत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असा इशाराही या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

जिल्ह्यातील तरुण पिढी नशेच्या अधीन होत असल्याने या गैरप्रकाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, कोल्हापूरहून वडाप आणि एसटीच्या माध्यमातून रत्नागिरीत येणाऱ्या गांजावर पायबंद घातला जाईल, असेही मुंढे यांनी सांगितले. 

शहरात काही ठिकाणी गांजाची चोरी-छुपे विक्री होत असल्याची माहिती होती. त्यानुसार नियोजन करून माझ्यासह श्री. घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, श्री. ढाकणे, शहर पोलिस निरीक्षक श्री. शहा, ८० पोलिस कर्मचारी आणि श्‍वान व्हिक्‍टर या टीमने शहरातील राहुल कॉलनीसह परिसरामध्ये कोंबिंग ऑपरेशन केले. श्‍वान व्हिक्‍टर नूरजहाँ आसिफ मिरजकर (वय २७, राहुल कॉलनी) हिच्या घरी शिरला. त्यामुळे त्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे २.०१५ किलो ग्रॅमचा गांजा मिळून आला. 

आजूबाजूच्या परिसरातही छापे टाकले. कत्तलखान्यामध्येही नूरजहाँ मिरजकर हिचा मुलगा नजफ आसिफ मिरजकर (वय २७) हा गांजा विक्री करताना आढळून आला. गांजा खरेदीसाठी आलेले जुबेर हुसन शेखावत (वय ३८, साळवी स्टॉप), रेहाना रियाज काळसेकर (वय २३, मजगाव), सर्फराज अहमद शहा (वय २९, गवळीवाडा) असे मिळून आले. त्यांच्याकडे ७७ ग्रॅम गांजा, सिगारेट पाकीट, माचीस, चिलीम, ३ मोबाईल मिळून आले. एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाचपैकी चौघांना बुधवार (ता. १०) पर्यत पोलिस कोठडी, तर शहा नामक संशयिताला वैद्यकीय कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT