कोकण

जिल्ह्यातील वाहनचालकांना गोवा ‘आरटीओ’कडून भुर्दंड

CD

87506

जिल्ह्यातील वाहनचालकांना
गोवा ‘आरटीओ’कडून भुर्दंड

राजन तेली ः डॉ. सावंतांचे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांवर गोवा आर.टी.ओ.कडून दंडाचा भुर्दंड आकारला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनचालकांना योग्य तो दिलासा मिळावा, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. यावेळी सर्वेश तेली उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुण-नोकरी नोकरीनिमित्त जवळच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. विशेषतःअनेक वाहनचालक गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत; मात्र, त्यांचे वाहन परवाने एमएच ०७ (सिंधुदुर्ग जिल्हा) असल्याने गोवा आर.टी.ओ.कडून नाहक दंड आकारला जात आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गेले कित्येक महिने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही नाराजी लक्षात घेत माजी आमदार तेली यांनी यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली. शिवाय अशा वाहनचालकांवर होणारी कारवाई थांबवून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. यावर योग्य तो उपाय काढावा, असेही सांगितले. दुसरीकडे आरोग्यवस्था आणि त्या संदर्भात असलेल्या समस्यांवरही त्यांनी चर्चा केली. या संदर्भातील रुग्णांना गोव्यातील योग्य व्यवस्थेबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचेही तेली यांनी सुचविले. मोपा विमानतळावर नवीन जागांसाठी भरती होणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्गातील युवकांना संधी देण्यात यावी, असेही तेली यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT