He left his job and started farming 
कोकण

नोकरी सोडून कातळावर पिकवली शेती ; पडीक जमिनीवर फुलविले नंदनवन 

सुधीर विश्‍वासराव

पावस - नोकरी करून पैसे कमावण्यापेक्षा आपल्याच पडीक जागेमध्ये शेती करून हक्काचे उत्पन्न घ्यावे, या उद्देशाने पाच वर्षापासून भाजी व्यवसाय सुरू केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांच्या नोकरीधंद्यावर परिणाम झाला पण या अडचणीच्या काळात कातळावर माती टाकून त्यावर केलेल्या भाजीपाल्यातून उत्पन्न मिळत आहे. ही भाजी आता रत्नागिरी शहराऐवजी रत्नागिरी-पावस या सागरी मार्गावरच  विक्री करून उन्नतीचा मार्ग सापडला, असे गोळप कातळवाडीतील अनिल सखाराम पवार या शेतकर्‍याने सांगितले. 

पवार यांनी कातळावरच पडवळ, मुळा, भेंडी, वाल-दोडका, काकडी, मोहरी, मेथी, पालक, कोथिंबीर, अननस आदींची लागवड केली आहे. पावस बाजारात मागणी वाढल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी पुढे नोकरी सोडून शेतीची कास धरली. वर्षभरात भातशेती आणि भाजीपाला लागवड करून त्यातून उत्पादन मिळवण्यास सुरवात केली. यंदा मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाला. सर्व व्यवहार ठप्प झाले. वाहतुकीची सोय नसल्यामुळे व सर्व दुकाने व व्यवसाय बंद असल्याने पावसला भाजीपाला विक्रीकरिता जाणे कठीण झाले. भाजीपाला विक्रीला परवानगी असल्यामुळे शेतातील भाजीपाला पावस मार्गावर विक्री सुरू केली. गेल्या सहा महिन्यात याला चांगलेच यश मिळाले.

शेतीतून हमखास उत्पन्न मिळते याची खात्री पटल्यामुळे कालांतराने आठ तासाची नोकरी सोडून शेतातच काबाडकष्ट करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. नोकरी सोडल्यानंतर मात्र भाजी लागवडीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहू लागलो. त्याला पत्नीने मदत केली. दिवसभर शेतातच काम करू लागल्याने उत्पन्न वाढू लागले. नोकरी न करता स्वतःच्या जागेत भातशेतीबरोबर भाजीपाला लागवड करून त्यातून उत्पादन मिळवण्याचा चंग पवार यांनी बांधला आणि तो यशस्वी करून दाखवला. पवार म्हणाले, कोरोनामुळे नोकरीऐवजी शेती व्यवसायामुळेच आम्ही तरलो. भाजीपाल्याच्या लागवडीत शेणखत, युरिया खताचा वापर करतो. पाण्याची योग्य मात्रा देऊन स्वतः मेहनत केल्यामुळे मजुरीचा प्रश्‍नच आला नाही. वर्षभर दुसर्‍या गावात जाऊन विक्री करण्यापेक्षा स्वतःच्या गावातच ताजी भाजी विकतो. शेतीसाठी कृषी सहाय्यक धनंजय पोळ यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले.

“नोकरी करून दुसर्‍याकडे राबण्यापेक्षा महिन्यापोटी भरलेल्या दिवसाचे पैसे मिळत होते. नोकरीपेक्षा जास्त स्वतःच्या जागेत लागवड करून हक्काचे उत्पन्न मिळत आहे. या व्यवसायातून खर्च वजा जाता महिन्याला आठ ते दहा हजार रुपये सहज मिळतात. आज मी आत्मनिर्भर बनलो आहे.”

- अनिल पवार.


संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT