heavy flood in ratnagiri district Flood water in Chanderai market in Ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ...

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने  बाजारपेठ भागातील व्यापारी व रहिवाशांनी कालची रात्र जागून काढली. आज सकाळी बाजारपेठ भागातही पाणी भरू लागले आहे. तसेच कोरोनामुळे चार महिने बाजारपेठ बंद होती आता पुरामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापार्‍यांनी आपला सामान, माल सुरक्षित स्थळी नेला आहे.

कालपासून (3) पडणार्‍या मुसळधार पावसाने यावर्षी प्रथमच बाजारपेठेत पाणी आले. दरवर्षी एक ते दोन वेळा पुलाला पाणी स्पर्श करते. चांदेराई गावचे दादा दळी यांनी सकाळच्या वाचकांसाठी व्हिडियो आणि छायाचित्रे पाठवली आहेत. शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चांदेरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पाणी वाढू लागले. साधारण सकाळी 9 च्या आसपास पाणी आणखी वाढले. त्यामुळे व्यापार्‍यांची धावपळ उडाली आणि दुकानातील सामान काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. चांदेराई बाजारपेठेमध्ये सुमारे लहान-मोठी अशी 100 हून अधिक दुकाने आहेत. तसेच शेजारीच लोकवस्ती असून अनेक घरांत लोक राहत आहेत. मात्र काल रात्रभर ते झोपू शकले नाहीत. पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती असल्यामुळे त्यांनी रात्र जागवून काढली.

काल रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा असल्याने नागरिक आनंदित होते. परंतु सायंकाळनंतर पुराचे पाणी वाढू लागल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. गेल्या वर्षी काजळीला आलेल्या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या महापुरामध्ये नुकसानग्रस्त व्यापार्‍यांना शासनाकडून चांगली मदत मिळाली होती. त्यामध्ये 27 घरे व सुमारे 130 दुकानदारांना मदत मिळाली.

काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरले. यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या वर्षीच्या आलेल्या महापुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्‍यांवर आता पुन्हा महापुराचे संकट ओढवणार आहे. 


चांदेराईला दरवर्षीच महापुराचा धोका जाणवतो. बाजारपेठेत चांदेराई, पाली, टिके, हरचिरी, कुरतडे आदी ठिकाणच्या लोकांची दुकाने आहेत. पंचक्रोशीची लोकसंख्या 10 हजार हजार असून बाजारपेठेत सुमारे 3 हजार लोकसंख्या आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी शासनाकडून भरपूर मदत मिळाली होती.’
- संयोग दळी,  माजी सरपंच, चांदेराई

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT