Home bill, water bill recovered sindhudurg distict 
कोकण

काही सुखद! सिंधुदुर्गवासीयांच्या प्रामाणिकपणाचा पुन्हा प्रत्यय 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील नागरिक नेहमीच शासकीय नियमाला महत्त्व देतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. कोरोना विषाणूची महामारी सुरू असल्याने हाताला काम नाही. असंख्य लोक घरीच बसून आहेत. तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी कर चुकवेगिरी केलेली नाही. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये वेळकाढूपणा नाही. गेल्यावर्षी तुलनेत नागरिकांनी कर भरलेला आहे. घरपट्टी 21 टक्के, तर पाणीपट्टी 22 टक्के भरल्याची नोंद आहे. 

एप्रिलपासून हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. एप्रिल ते ऑगस्ट, असे पाच महिने आर्थिक वर्षातील संपले आहेत; मात्र या पाचही महिन्यांत कोरोना प्रभाव राहिला आहे. रोजगार नाही, व्यवसाय नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील नागरिक वेळेवर कर भरणार नाहीत, असा अंदाज होता; परंतु ग्रामीण नागरिकांनी तो फोल ठरवित या जिल्ह्यातील नागरिक कितीही आर्थिक संकट आले तरी कर चुकवित नाहीत. शासनाचे नियम पाळतात, हे दाखवून दिले आहे. 

उद्दिष्टाच्या 21 टक्के 
जिल्ह्यात 431 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना 2019-20 व 2020-21, अशी मिळून 20 कोटी 97 लाख 41 हजार एवढी घरपट्टीची मागणी आहे. यातील पहिल्या पाच महिन्यांत 4 कोटी 30 लाख 20 हजार रुपये वसुली झाली आहे. ही वसुली उद्दिष्टाच्या 21 टक्के आहे. 

निश्‍चितच प्रशंसनीय 
गेल्या 2019-20 या आर्थिक वर्षात या पाच महिन्यांत ही वसुली 23 टक्के होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 2 टक्के वसुली कमी झाली आहे. कोरोनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आर्थिक स्थिती नाजूक आहे. दोन वेळचे जेवण मिळविणे मुश्‍किल असताना भरलेला कर निश्‍चितच प्रशंसनीय आहे. 

पाणीपट्टी वसुलीत पुढे 
जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींना मिळून 8 कोटी 21 लाख 22 हजार एवढी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यात 2019-20 ची थकीत 29 लाख 74 हजार रुपये आहे तर 2020-21 ची 7 कोटी 91 लाख 48 हजार रुपये रक्कमेचा समावेश आहे. यातील 1 कोटी 77 लाख 21 हजार रुपये वसुली झाली आहे. एकूण मागणीच्या 22 टक्के ही वसुली झाली आहे. गेल्यावर्षी या पाच महिन्यात 20 टक्के एवढी वसुली होती. याचाच अर्थ कोरोना प्रभाव असतानाही 2 टक्के वसुली जास्त झाली आहे. म्हणजे यावर्षी वसुली दोन पावले पुढे आहे. 

वसुली कमीची शक्‍यता 
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात घरोघरी साजरा होतो. यावेळी चाकरमानी मोठ्या संख्यने गावात येतात. या कालावधीत ग्रामपंचायत विभाग विशेष मोहीम राबवून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करीत असतो. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आला होता. यावर्षी तो ऑगस्ट महिन्यात आला. त्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये वसुली जास्त झाली होती; मात्र यावर्षी आधीच गणेशोत्सव संपल्याने सप्टेंबरच्या वसुलीवर परिणाम होणार आहे. 

तालुकानिहाय वसुली (घरपट्टी) 

तालुका टक्केवारी 
मालवण 29 
कुडाळ 24 
देवगड 19 
वैभववाडी 19 
सावंतवाडी 18 
वेंगुर्ले 18 
कणकवली 16 
दोडामार्ग 15 

तालुकानिहाय पाणीपट्टी वसुली 

तालुका टक्केवारी 
सावंतवाडी 31 
कुडाळ 27 
मालवण 25 
वैभववाडी 23 
दोडामार्ग 20 
देवगड 19 
वेंगुर्ले 19 
कणकवली 16  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT